शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

स्थायी समिती सदस्य निवडीचा खेळ रंगणार

By admin | Updated: July 25, 2016 00:44 IST

महापालिकेतील काँग्रेसमध्ये गृहकलह : स्वाभिमानी विकास आघाडीचे नोंदणी रद्दमुळे त्रांगडे

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. नव्या सदस्य निवडीची प्रक्रिया आॅगस्ट महिन्यातील महासभेत होणार आहे. सत्ताधारी काँग्रेसमधील गृहकलह, निवडणूक आयोगाकडून स्वाभिमानी आघाडीची मान्यता रद्द या पार्श्वभूमीवर निवडीचा खेळ चांगलाच रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आमदार जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व असल्याने त्यांचाच निर्णय अंतिम राहील. स्थायी समितीत काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे ५, तर स्वाभिमानी आघाडीचे दोन असे सोळा सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्य आॅगस्ट महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यात काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार, दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, आशा शिंदे, जमिला बागवान, स्वाभिमानीचे शांता जाधव, अश्विनी खंडागळे यांचा समावेश आहे. सभापती संतोष पाटील यांचीही मुदत आॅगस्टमध्ये संपत आहे. नव्या सदस्यांच्या निवडी आॅगस्टमधील महासभेत होणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभापती निवड होईल. सध्या सत्ताधारी कॉँग्रेसमध्ये गृहकलह उफाळून आला आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांनी स्वतंत्र गट तयार केला आहे. त्याला स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांची साथसंगत मिळत आहे. मदन पाटील गट विरुद्ध विशाल पाटील गट असा सामना पालिकेच्या राजकारणात सुरू आहे. गत महापौर, उपमहापौर निवडीवेळी या गटाने उघडरित्या बंडाचा झेंडा हाती घेतला होता. अखेर उपमहापौर पदावर तडजोड झाल्याने विशाल पाटील गटाचे बंड शमले होते. त्यानंतर मागासवर्गीय समिती सभापती निवडीवेळीही या गटाने डोके वर काढले होते, पण मदनभाऊ गटाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत विशाल पाटील गटाला शह दिला होता. त्यामुळे स्थायी सदस्य निवडीवेळीही हा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. विशाल पाटील गटाकडून स्थायी समितीतील प्रतिनिधित्वासाठी आग्रही भूमिका घेतली जाईल. त्यात सदस्य निवडीचे अधिकार जयश्रीताई पाटील व आमदार पतंगराव कदम यांच्याकडे असतील. त्यांच्या आदेशानेच सदस्य निवडी होणार असल्याने या गटाला प्रतिनिधित्व मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यात गटनेते किशोर जामदार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या पत्रावर निवडी होत असल्याने ते कोणाची नावे देतात, यावर बरीच गणित अवलंबून आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारेच काही आलबेल आहे असे नाही. राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी विशाल पाटील गटाशी संधान साधले आहे. पण राष्ट्रवादीचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांचा निर्णय जयंतरावच घेतील, असे दिसते. (प्रतिनिधी) मदनभाऊ गटाच्या हाती नाड्या स्वाभिमानी आघाडीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेत ही आघाडी अस्तित्वशून्य झाली आहे. या आघाडीचे दोन सदस्य स्थायी समितीत आहेत. अजून तरी स्वाभिमानीच्या मान्यतेबाबत कोणताही आदेश महापौर अथवा आयुक्तांनी काढलेला नाही. स्थायी समिती निवडीवेळी मात्र हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. स्थायी समितीत आघाडीला स्थान न देण्याची खेळी सत्ताधारी काँग्रेसने खेळल्यास स्वाभिमानीची मोठी कोंडी होणार आहे. स्वाभिमानी आघाडीच्या नाड्या आता मदनभाऊ पाटील गटाच्या हातात आहेत. सत्ताधाऱ्यांनी मनात आणले तर स्वाभिमानीच्या दोन जागा काढून घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. तशा हालचालीही सुरू आहेत.