शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सदस्य निवडीचा खेळ रंगणार

By admin | Updated: July 25, 2016 00:44 IST

महापालिकेतील काँग्रेसमध्ये गृहकलह : स्वाभिमानी विकास आघाडीचे नोंदणी रद्दमुळे त्रांगडे

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. नव्या सदस्य निवडीची प्रक्रिया आॅगस्ट महिन्यातील महासभेत होणार आहे. सत्ताधारी काँग्रेसमधील गृहकलह, निवडणूक आयोगाकडून स्वाभिमानी आघाडीची मान्यता रद्द या पार्श्वभूमीवर निवडीचा खेळ चांगलाच रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आमदार जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व असल्याने त्यांचाच निर्णय अंतिम राहील. स्थायी समितीत काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे ५, तर स्वाभिमानी आघाडीचे दोन असे सोळा सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्य आॅगस्ट महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यात काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार, दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, आशा शिंदे, जमिला बागवान, स्वाभिमानीचे शांता जाधव, अश्विनी खंडागळे यांचा समावेश आहे. सभापती संतोष पाटील यांचीही मुदत आॅगस्टमध्ये संपत आहे. नव्या सदस्यांच्या निवडी आॅगस्टमधील महासभेत होणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभापती निवड होईल. सध्या सत्ताधारी कॉँग्रेसमध्ये गृहकलह उफाळून आला आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांनी स्वतंत्र गट तयार केला आहे. त्याला स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांची साथसंगत मिळत आहे. मदन पाटील गट विरुद्ध विशाल पाटील गट असा सामना पालिकेच्या राजकारणात सुरू आहे. गत महापौर, उपमहापौर निवडीवेळी या गटाने उघडरित्या बंडाचा झेंडा हाती घेतला होता. अखेर उपमहापौर पदावर तडजोड झाल्याने विशाल पाटील गटाचे बंड शमले होते. त्यानंतर मागासवर्गीय समिती सभापती निवडीवेळीही या गटाने डोके वर काढले होते, पण मदनभाऊ गटाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत विशाल पाटील गटाला शह दिला होता. त्यामुळे स्थायी सदस्य निवडीवेळीही हा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. विशाल पाटील गटाकडून स्थायी समितीतील प्रतिनिधित्वासाठी आग्रही भूमिका घेतली जाईल. त्यात सदस्य निवडीचे अधिकार जयश्रीताई पाटील व आमदार पतंगराव कदम यांच्याकडे असतील. त्यांच्या आदेशानेच सदस्य निवडी होणार असल्याने या गटाला प्रतिनिधित्व मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यात गटनेते किशोर जामदार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या पत्रावर निवडी होत असल्याने ते कोणाची नावे देतात, यावर बरीच गणित अवलंबून आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारेच काही आलबेल आहे असे नाही. राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी विशाल पाटील गटाशी संधान साधले आहे. पण राष्ट्रवादीचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांचा निर्णय जयंतरावच घेतील, असे दिसते. (प्रतिनिधी) मदनभाऊ गटाच्या हाती नाड्या स्वाभिमानी आघाडीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेत ही आघाडी अस्तित्वशून्य झाली आहे. या आघाडीचे दोन सदस्य स्थायी समितीत आहेत. अजून तरी स्वाभिमानीच्या मान्यतेबाबत कोणताही आदेश महापौर अथवा आयुक्तांनी काढलेला नाही. स्थायी समिती निवडीवेळी मात्र हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. स्थायी समितीत आघाडीला स्थान न देण्याची खेळी सत्ताधारी काँग्रेसने खेळल्यास स्वाभिमानीची मोठी कोंडी होणार आहे. स्वाभिमानी आघाडीच्या नाड्या आता मदनभाऊ पाटील गटाच्या हातात आहेत. सत्ताधाऱ्यांनी मनात आणले तर स्वाभिमानीच्या दोन जागा काढून घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. तशा हालचालीही सुरू आहेत.