शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 18:50 IST

२५ वर्षांनंतर दिग्गज नेत्यांची थांबली टिकटिक

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक १९९९ पासून घड्याळ चिन्हावर राज्य करीत होते. त्यांचा राजकीय आलेख आजही चढताच आहे. मात्र, अजित पवार पक्ष आणि घड्याळासह भाजपमध्ये सामील झाल्याने दिग्गज नेत्यांच्या घड्याळाची टिकटिक गेल्या २५ वर्षांनंतर थांबली आहे.राज्यात १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हापासून तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पवार यांचे नेतृत्व मानले. राष्ट्रवादी पक्षात विविध पदे भोगताना पक्षातील काहींची पाटील यांना अडथळेही आले. तरी सुद्धा जयंत पाटील यांनी पवार यांच्यावरील आपली निष्ठा ढळू दिली नाही. त्यांना शिराळा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांची साथही मोलाची ठरली.तत्कालीन महाविकास आघाडीच्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावला. तेव्हापासून महाविकास आघाडीतील पक्षांना घरघर लागली. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन राष्ट्रवादीचाच दुसरा गट स्थापन केला. भाजपशी युती करून उपमुख्यमंत्रिपद मिळविले आणि राज्यात स्वत:च्या गटाचे अस्तित्व निर्माण करण्याचा डाव आखला आहे.

राज्यात अजित पवार यांच्या गटाची ताकद वाढवण्यासाठी विविध तालुक्यांत पदाधिकाऱ्यांची नवीन फाैज तैनात करण्यात आली. त्यातच पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे. यावर जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांनी मौन पाळले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.सध्यातरी दोन दिग्गज नेत्यांच्या घड्याळाची टिकटिक थांबली असली तरी जयंत पाटील यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आमदार मानसिंगराव नाईक यांनीही गेल्या सहा महिन्यांतील राजकीय घडामोडींवर आपण काहीही बोलणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे.जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यातराज्यात अजित पवार यांच्या गटाची ताकद वाढवण्यासाठी विविध तालुक्यात पदाधिकाऱ्यांची नवीन फौज तैनात करण्यात आली. त्यातच पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील