शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सुफियाचे सांगलीत स्वागत - : श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत धाव; शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:56 PM

केवळ शांततेचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा उपक्रम राजस्थानच्या सुफिया खानने सुरू केला आहे. मंगळवारी सांगलीत तिचे शहीद अशोक कामटे

ठळक मुद्दे अनोखा उपक्रम

सांगली : केवळ शांततेचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा उपक्रम राजस्थानच्या सुफिया खानने सुरू केला आहे. मंगळवारी सांगलीत तिचे शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशन व शहीद मॅरेथॉन रनरच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

जगात शांतता नांदावी म्हणून राजस्थान येथील सुफिया खान ही तरुणी श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ कि.मी.चे अंतर धावत प्रवास करीत आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी श्रीनगर येथून धावण्यास सुरुवात केली आहे. तिच्याबरोबर हरियाणा येथील विकाससिंग सोबत आहेत. तब्बल ६२ दिवस सतत धावत तिने मंगळवारी पहाटे सांगली गाठली. वाठार (ता. कºहाड) येथे तिचे स्वागत करण्यात आले. या ग्रुपच्या १०० हून अधिक सदस्यांनी व सांगलीच्या सायकलस्नेही ग्रुपच्या सदस्यांनी तिच्याबरोबर वाठार ते कोल्हापूरपर्यंत असा प्रवास केला.

आपुलकीच्या स्वागताने सुफिया भारावून गेली. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या अनेक महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कार्याला पुढे नेताना आनंद वाटत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील संघटनांनी दिलेले हे प्रेम सोबत राहील, असे तिने सांगितले. तिच्या या प्रवासाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली असून, या उपक्रमाची नोंद पुस्तकात होणार आहे. सांगली जिल्ह्यात कासेगाव, पेठ, नेर्र्ले, येडेनिपाणी, येलूर, कणेगाव येथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. तिच्या या प्रवासात डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, श्रीकांत कुंभार, अक्रम मुजावर, देवीदास चव्हाण, गणपत पवार, संतोष जाधव, सुधीर भगत, प्रदीप सुतार, श्वेता चिखली, अमित कांबळे, डॉ. मनालाल अंबीकाटक आदी सहभागी झाले होते. कर्नाटक, तामिळनाडूमार्गे ती जाणार आहे. 

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारत