शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

सोनसळमधील दोघा भावंडांना मिळणार संगोपन भत्ता, शासकीय नोकरी; सिलिंडरच्या स्फोटामुळे बनले होते निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:28 IST

'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.

सांगली : सोनसळ (ता. कडेगाव) येथील सोनाली कदम आणि अभिराज कदम या दोघा निराधारांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय मदत देण्याची कार्यवाही चालू आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना महिन्याला संगोपन भत्ता आणि नोकरी, शिक्षणात एक टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठीचा अनाथ प्रमाणपत्राचा प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली. जखमी मुलांची आई ज्योती अंकुश कदम यांचे उपचारावेळी निधन झाले, त्यानंतर दहा दिवसांत वडील अंकुश यांचेही निधन झाले.

जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवत पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. या मुलांवर वैद्यकीय उपचार होण्याची गरज असून, त्यांचे शिक्षणही चालू राहिले पाहिजे. या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे मदतीची याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी होऊन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने सांगली जिल्हाधिकारी यांना मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी तातडीने मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एच. बेंद्रे यांनी बालसंगोपन योजनेंतर्गत या अनाथ बालकांना त्यांचे शिक्षण व संगोपन याकरिता दरमहा ११०० रुपये प्रती मुलास मिळणार आहेत. दोन्ही बालकांना शिक्षण व नोकरीमध्ये १ टक्के आरक्षणाचा लाभ देणार आहे. यासाठी बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणार आहे, असेही बेंद्रे यांनी सांगितले.वैद्यकीय उपचार, शिक्षणासाठी ठोस मदतीची गरजसोनाली आणि अभिराज या दोघा निराधारांना शासकीय मदत मिळणार आहे; पण ती मदत तुटपुंजी असल्यामुळे त्यांचा वैद्यकीय खर्च आणि शिक्षण, संगोपनासाठी मोठा खर्च येणार आहे. यासाठी ठोस मदतीची गरज असून, दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीfireआगDeathमृत्यू