शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सोनसळमधील दोघा भावंडांना मिळणार संगोपन भत्ता, शासकीय नोकरी; सिलिंडरच्या स्फोटामुळे बनले होते निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:28 IST

'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.

सांगली : सोनसळ (ता. कडेगाव) येथील सोनाली कदम आणि अभिराज कदम या दोघा निराधारांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय मदत देण्याची कार्यवाही चालू आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना महिन्याला संगोपन भत्ता आणि नोकरी, शिक्षणात एक टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठीचा अनाथ प्रमाणपत्राचा प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली. जखमी मुलांची आई ज्योती अंकुश कदम यांचे उपचारावेळी निधन झाले, त्यानंतर दहा दिवसांत वडील अंकुश यांचेही निधन झाले.

जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवत पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. या मुलांवर वैद्यकीय उपचार होण्याची गरज असून, त्यांचे शिक्षणही चालू राहिले पाहिजे. या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे मदतीची याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी होऊन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने सांगली जिल्हाधिकारी यांना मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी तातडीने मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एच. बेंद्रे यांनी बालसंगोपन योजनेंतर्गत या अनाथ बालकांना त्यांचे शिक्षण व संगोपन याकरिता दरमहा ११०० रुपये प्रती मुलास मिळणार आहेत. दोन्ही बालकांना शिक्षण व नोकरीमध्ये १ टक्के आरक्षणाचा लाभ देणार आहे. यासाठी बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणार आहे, असेही बेंद्रे यांनी सांगितले.वैद्यकीय उपचार, शिक्षणासाठी ठोस मदतीची गरजसोनाली आणि अभिराज या दोघा निराधारांना शासकीय मदत मिळणार आहे; पण ती मदत तुटपुंजी असल्यामुळे त्यांचा वैद्यकीय खर्च आणि शिक्षण, संगोपनासाठी मोठा खर्च येणार आहे. यासाठी ठोस मदतीची गरज असून, दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीfireआगDeathमृत्यू