शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

महाआघाडी सरकारवर काही सत्ताधारी आमदारच नाराज, तर काही समाधानी; सांगली जिल्ह्यातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 17:26 IST

एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे.

सांगली : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होत आली आहेत. या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनाकाँग्रेसच्या आमदारांमध्ये सरकारच्या कामकाजावरुन समन्वय नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे, मात्र सत्ताधारी आमदारच सरकारच्या कामगिरीवर खूश नसल्याची बाब समोर येत आहे. आमदारांच्या मतदारसंघातील कामे होत नसल्याच्या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत.  सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो. त्यानंतर काँग्रेस, भाजप व शिवसेनेचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अपक्ष एकही आमदार नाही. एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसते.सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार समाधानी आहेत का?काँग्रेसविश्वजित कदम : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल केल्याचे सांगितले आहे.  विक्रम सावंत : मतदारसंघातील कामे प्राधान्याने व्हायला हवीत. येथील पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. प्रतिव्यक्ती जमीनधारणेत सर्वात मोठा तालुका असूनही जतच्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे, असे सावंत म्हणाले.राष्ट्रवादीजयंत पाटील : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.मानसिंगराव नाईक : शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, तालुक्यातील सर्व महत्त्वाची कामे महाविकास आघाडी सरकारमुळे मार्गी लागली आहेत. मतदारसंघातील कामे प्राधान्याने पूर्ण झाली. कुठेही अडचणी आल्या नाहीत.सुमनताई पाटील : राज्य सरकारच्या एकूणच कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आम्ही सुचविलेली अनेक कामे मंजूर होतात, असे तासगाव-कवठेमहांकाळच्या आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले.शिवसेनाअनिल बाबर :  खानापूर मतदारसंघातील कामे होत नसल्याबाबत बाबर यांनी पक्षीय नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र याबाबत त्यांनी मत व्यक्त केले नाही.

नेमक्या काय आहेत तक्रारी...

  • प्रस्ताव पडून : शिवसेना, काँग्रेस हे मित्रपक्ष असूनही त्यांच्या आमदारांनी दिलेले प्रस्ताव शासनदरबारी तसेच पडून आहेत.
  • कुरघोड्यांचे राजकारण : मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुरघोड्या केल्या जात असल्याचे शिवसेना, काँग्रेस पदाधिकारी सांगतात.
  • श्रेय लाटले जाते : एखादे काम शिवसेना, काँग्रेस आमदारांनी केले, तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लोक घेत आहेत.
टॅग्स :SangliसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना