शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

महाआघाडी सरकारवर काही सत्ताधारी आमदारच नाराज, तर काही समाधानी; सांगली जिल्ह्यातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 17:26 IST

एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे.

सांगली : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होत आली आहेत. या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनाकाँग्रेसच्या आमदारांमध्ये सरकारच्या कामकाजावरुन समन्वय नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे, मात्र सत्ताधारी आमदारच सरकारच्या कामगिरीवर खूश नसल्याची बाब समोर येत आहे. आमदारांच्या मतदारसंघातील कामे होत नसल्याच्या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत.  सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो. त्यानंतर काँग्रेस, भाजप व शिवसेनेचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अपक्ष एकही आमदार नाही. एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसते.सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार समाधानी आहेत का?काँग्रेसविश्वजित कदम : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल केल्याचे सांगितले आहे.  विक्रम सावंत : मतदारसंघातील कामे प्राधान्याने व्हायला हवीत. येथील पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. प्रतिव्यक्ती जमीनधारणेत सर्वात मोठा तालुका असूनही जतच्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे, असे सावंत म्हणाले.राष्ट्रवादीजयंत पाटील : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.मानसिंगराव नाईक : शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, तालुक्यातील सर्व महत्त्वाची कामे महाविकास आघाडी सरकारमुळे मार्गी लागली आहेत. मतदारसंघातील कामे प्राधान्याने पूर्ण झाली. कुठेही अडचणी आल्या नाहीत.सुमनताई पाटील : राज्य सरकारच्या एकूणच कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आम्ही सुचविलेली अनेक कामे मंजूर होतात, असे तासगाव-कवठेमहांकाळच्या आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले.शिवसेनाअनिल बाबर :  खानापूर मतदारसंघातील कामे होत नसल्याबाबत बाबर यांनी पक्षीय नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र याबाबत त्यांनी मत व्यक्त केले नाही.

नेमक्या काय आहेत तक्रारी...

  • प्रस्ताव पडून : शिवसेना, काँग्रेस हे मित्रपक्ष असूनही त्यांच्या आमदारांनी दिलेले प्रस्ताव शासनदरबारी तसेच पडून आहेत.
  • कुरघोड्यांचे राजकारण : मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुरघोड्या केल्या जात असल्याचे शिवसेना, काँग्रेस पदाधिकारी सांगतात.
  • श्रेय लाटले जाते : एखादे काम शिवसेना, काँग्रेस आमदारांनी केले, तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लोक घेत आहेत.
टॅग्स :SangliसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना