शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील ‘जलजीवन मिशन’च्या कामांचे २६ जानेवारीला सोशल ऑडिट, कामाच्या गुणवत्तेवर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:40 IST

शासनाच्या या निर्णयामुळे अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचीही पंचाईत

सांगली : जिल्ह्यातील ६३६ गावांमध्ये ६९३ पाणी योजनांची कामे जलजीवन मिशन योजनेतून सुरू आहेत. यासाठी ७२८ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या योजनेतून झालेल्या कामाचे सोशल ऑडिट करण्यासाठी शासनाने दि. २६ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा घेऊन त्यामध्ये कामांचे वाचन होऊन चर्चाही होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचीही पंचाईत झाली आहे.जलजीवन मिशनमध्ये लोकसहभाग व पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न चालू आहेत. दि. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित केले आहे.

समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना परिचय करून देण्यात येणार आहे. पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या महिलांना सभेस आमंत्रित करून सन्मानित करण्यात येणार आहे. त्या महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.ग्रामसभेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजूर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थितीवर चर्चा होणार आहे. योजनेअंतर्गत गावातील पाणीपुरवठा आणि त्याच्या गुणवत्तेवरही चर्चा होणार आहे.

१० टक्के लोकवर्गणीजलजीवन मिशन योजनेत सहभागी गावांमधील लोकांकडून गावांतर्गत पाइपलाइनसह अन्य सुविधांच्या कामांवर खर्च झालेल्या रकमेच्या १० टक्के लोकवर्गणी काढण्यात येणार आहे. तसेच डोंगरी भागातील गावांसाठी ५ टक्के लोकवर्गणी गोळा करण्यात येणार आहे. ही सर्व रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावरच राहणार असून त्यातून योजना पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जलजीवन मिशन योजनेची कामे दर्जेदार होतात की नाही, याचे सामाजिक लेखा परीक्षण करण्यासाठी दि. २६ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा बोलविली आहे. योजनेची कामे, खर्च झालेला निधी आदींवर चर्चा होणार आहे. म्हणून नागरिकांनी या ग्रामसभेस मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे. -जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी