शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

..तर भाजपच्या विरोधात मतदान, ईपीएस निवृत्तिवेतनधारकांच्या अधिवेशनात देण्यात आला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 15:44 IST

सरकारच्या नीती-धोरणांवर हल्लाबोल

सांगली : निवृत्तिवेतनधारक ही एक सामाजिक शक्ती बनली आहे. सरकारने निवृत्तिवेतन दिले नाही, तर भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा ईपीएस निवृत्तिवेतनधारकांच्या अधिवेशनात देण्यात आला.अखिल भारतीय समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन शेगावमध्ये झाले. केंद्र शासनाच्या पेन्शनरविरोधी धोरणांविरोधात तीव्र संघर्षाचा ठराव करण्यात आला. ‘जो पेन्शन का काम ना करे, वह सरकार बदलनी है’ अशा घोषणांनी अधिवेशन दणाणून गेले.केरळचे प्रतिनिधी एम. धर्माजन अध्यक्षस्थानी होते. भविष्य निर्वाह निधी सेलचे सदस्य सुकुमार दामले यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले की, सरकार उद्योगपतींवर सवलतींचा वर्षाव करत आहे. पण, सर्वसामान्यांच्या छोट्याछोट्या गरजांसाठीसुद्धा पैसा नाही.ट्रेड युनियनचे उपाध्यक्ष उदय भट यांनी सरकारच्या नीती-धोरणांवर हल्लाबोल केला. सरकार घटनेतील समता व बंधुभाव यांच्या विरोधात असल्याने लोकशाही संकटात असल्याचे सांगितले.इंटकचे श्याम काळे यांनी सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाल्याचे सांगितले. अतुल दिघे यांनी ठराव मांडला. सरकारवर दबाव वाढविण्यासाठी आक्रमक आंदोलनाचा निर्णय झाला.अधिवेशनासाठी देशभरातून सदस्य सहभागी होते. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी एम. एन. रेड्डी, एम. धर्मजन व महासचिवपदी अतुल दिघे यांना निवडण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा