शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

..तर भाजपच्या विरोधात मतदान, ईपीएस निवृत्तिवेतनधारकांच्या अधिवेशनात देण्यात आला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 15:44 IST

सरकारच्या नीती-धोरणांवर हल्लाबोल

सांगली : निवृत्तिवेतनधारक ही एक सामाजिक शक्ती बनली आहे. सरकारने निवृत्तिवेतन दिले नाही, तर भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा ईपीएस निवृत्तिवेतनधारकांच्या अधिवेशनात देण्यात आला.अखिल भारतीय समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन शेगावमध्ये झाले. केंद्र शासनाच्या पेन्शनरविरोधी धोरणांविरोधात तीव्र संघर्षाचा ठराव करण्यात आला. ‘जो पेन्शन का काम ना करे, वह सरकार बदलनी है’ अशा घोषणांनी अधिवेशन दणाणून गेले.केरळचे प्रतिनिधी एम. धर्माजन अध्यक्षस्थानी होते. भविष्य निर्वाह निधी सेलचे सदस्य सुकुमार दामले यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले की, सरकार उद्योगपतींवर सवलतींचा वर्षाव करत आहे. पण, सर्वसामान्यांच्या छोट्याछोट्या गरजांसाठीसुद्धा पैसा नाही.ट्रेड युनियनचे उपाध्यक्ष उदय भट यांनी सरकारच्या नीती-धोरणांवर हल्लाबोल केला. सरकार घटनेतील समता व बंधुभाव यांच्या विरोधात असल्याने लोकशाही संकटात असल्याचे सांगितले.इंटकचे श्याम काळे यांनी सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाल्याचे सांगितले. अतुल दिघे यांनी ठराव मांडला. सरकारवर दबाव वाढविण्यासाठी आक्रमक आंदोलनाचा निर्णय झाला.अधिवेशनासाठी देशभरातून सदस्य सहभागी होते. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी एम. एन. रेड्डी, एम. धर्मजन व महासचिवपदी अतुल दिघे यांना निवडण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा