शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुजरातमधून बोगस कीटकनाशकांची मिरजेत तस्करी, कर चुकवेगिरीसह शेतकऱ्यांच्या लुटीचा उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 12:10 IST

पैसे वाचविण्यासाठी हजारो शेतकरी या टोळीच्या जाळ्यात अडकले

अविनाश कोळीसांगली : कमी पैशात कृषी औषधे पुरविण्याचे आमिष दाखवून मिरज तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग सोनी परिसरातील एका टोळीने सुरू केला आहे. गुजरातमधील एका कंपनीकडून हा माल आणून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर चुकवित बोगस औषधांचा काळाबाजार सध्या जोमात आहे. यातून टोळीतील सदस्य अल्पावधित मालामाल झाले असून शेतकरी मात्र कंगाल होत आहेत.मिरज तालुक्यातील काही गावात या टोळीने त्यांचे साम्राज्य निर्माण केले आहे. बाजारातील कृषी औषधांच्या दरापेक्षा ३० ते ५० टक्के कमी दरात औषधांचा पुरवठा केला जातो. पैसे वाचविण्यासाठी हजारो शेतकरी या टोळीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडे आगाऊ पैसे भरून बुकिंग केले जाते. अत्यंत घातक रसायनांचा वापर करून शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. या खेळात अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसानही झाले आहे. टोळीविरोधात तक्रार करण्याचे धाडस शेतकऱ्यांकडून होत नसल्याने टोळीने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

रात्रीच येतो ट्रक, रात्रीत होते वाटपशेतकऱ्यांकडून बुकिंग झाल्यानंतर ट्रकभर मालाची ऑर्डर गुजरातमधील कंपनीला दिली जाते. हा ट्रक शासकीय यंत्रणांना चकवा देत कर्नाटकमार्गे मिरज तालुक्यातील सोनी किंवा जवळच्या गावांमध्ये येतो. रात्रीच हा ट्रक येईल, असे नियोजन केले जाते. ट्रक आल्यानंतर रातोरात त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना केले जाते. माल शिल्लक ठेवला जात नाही.

हवालामार्फत होतो व्यवहारया सर्व औषधांचा व्यवहार हवालामार्फत होतो. गुजरातच्या संबंधित कंपनीलाही हवालामार्फत पैसे पाठविले जातात. त्यामुळे या व्यवहाराची अधिकृत नोंद कुठेही सापडत नाही.

टोळीतील सदस्यांच्या राहणीमानात बदलबोगस औषधांचा पुरवठा करून, कर चुकवून टोळीतील सदस्य अल्पावधित मालामाल झाले आहेत. त्यांच्या राहणीमानातही कमालीचा बदल झाला आहे. सावकार म्हणून आता ते मिरवित आहेत.

कायद्याची अंमलबजावणी कुठे आहे?राज्यात कीटकनाशक कायदा-१९६८ व कीटकनाशक नियम-१९७१ मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. नफेखोरीसाठी अनेक कंपन्या व टोळ्या शेतकऱ्यांच्या जिवाशीही खेळत आहेत. त्यामुळे या टोळीची पाळेमुळे नष्ट करण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी