शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

साठ हजारावर ऊसतोडणी मजूर परतले गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:49 IST

बहुतांशी मजूर बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर काही ऊसतोड मजुरांनी कारखान्यांना न सांगताच गुपचूप गाव जवळ केले होते. उर्वरित ऊसतोड मजूर मात्र संचारबंदीमुळे अडकून पडले होते.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी घेतला पुढाकार; कर्नाटक, मध्यप्रदेशातील अनेक मजूर मात्र अडकले

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संचारबंदी जाहीर केल्यामुळे जिल्ह्यात ६२ हजार ५०० ऊसतोड मजूर अडकून पडले होते. राज्य शासनाने या मजुरांना गावी पाठविण्यासाठी साखर कारखान्यांना परवानगी दिल्यानंतर ६० हजार मजूर गावी सुखरुप पोहोचले आहेत. आंतरराज्य बंदी कायम असल्यामुळे कर्नाटक, मध्यप्रदेशातील दोन हजार ५०० मजुरांना दि. ३ मेपर्यंत सांगली जिल्ह्यातच रहावे लागणार आहे.

जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांपैकी १२ कारखान्यांनीच यावर्षी गळीत हंगाम घेतले होते. या कारखान्यांकडे ६२ हजार ५०० ऊसतोड मजूर आले होते. बहुतांशी मजूर बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर काही ऊसतोड मजुरांनी कारखान्यांना न सांगताच गुपचूप गाव जवळ केले होते. उर्वरित ऊसतोड मजूर मात्र संचारबंदीमुळे अडकून पडले होते. काही ठिकाणी ऊस शिल्लक असतानाही त्यांनी गावी जाण्याची भूमिका घेतली होती. मजूर संघटनेने शासनाकडे मजुरांना गावी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने १६ एप्रिलला परवानगी दिली. साखर कारखान्यांनी त्यानुसार ऊसतोड मजुरांना प्रत्येकाच्या गावी सुखरुप पोहोच केले.

राज्यातील गेले : राज्याबाहेरील थांबलेराजारामबापू साखर कारखान्याकडील १५ हजार मजुरांपैकी आंतरराज्य बंदीमुळे कर्नाटक राज्यातील ४०० आणि मध्यप्रदेशातील ६० ऊसतोड मजुरांना पाठविता आले नाही. उर्वरित राज्यातील सर्व मजुरांना सुखरुप गावी पाठविले आहे. जे आंतरराज्य मजूर आहेत, त्यांनाही धान्य दिले असून, गरजेनुसार लागेल त्या वस्तू कारखाना पुरवठा करीत आहे, अशी प्रतिक्रिया राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी दिली.

ऊसतोडणी मजुरांचे तांडे आता त्यांच्या गावाकडे परतु लागले आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरून बिड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर शनिवारी परतीच्या वाटेला लागले होते.

65रुपये प्रत्येक कारखान्यास मजुरांना गावी पोहोचविण्यासाठी खर्च आला आहे. मजूर आणणे आणि त्यांना गावी सोडण्याची जबाबदारी कारखान्यांचीच आहे.

2500मजूर कारखान्यांकडे आहेत. या मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय कारखाना प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने