शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साठ हजारावर ऊसतोडणी मजूर परतले गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:49 IST

बहुतांशी मजूर बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर काही ऊसतोड मजुरांनी कारखान्यांना न सांगताच गुपचूप गाव जवळ केले होते. उर्वरित ऊसतोड मजूर मात्र संचारबंदीमुळे अडकून पडले होते.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी घेतला पुढाकार; कर्नाटक, मध्यप्रदेशातील अनेक मजूर मात्र अडकले

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संचारबंदी जाहीर केल्यामुळे जिल्ह्यात ६२ हजार ५०० ऊसतोड मजूर अडकून पडले होते. राज्य शासनाने या मजुरांना गावी पाठविण्यासाठी साखर कारखान्यांना परवानगी दिल्यानंतर ६० हजार मजूर गावी सुखरुप पोहोचले आहेत. आंतरराज्य बंदी कायम असल्यामुळे कर्नाटक, मध्यप्रदेशातील दोन हजार ५०० मजुरांना दि. ३ मेपर्यंत सांगली जिल्ह्यातच रहावे लागणार आहे.

जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांपैकी १२ कारखान्यांनीच यावर्षी गळीत हंगाम घेतले होते. या कारखान्यांकडे ६२ हजार ५०० ऊसतोड मजूर आले होते. बहुतांशी मजूर बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर काही ऊसतोड मजुरांनी कारखान्यांना न सांगताच गुपचूप गाव जवळ केले होते. उर्वरित ऊसतोड मजूर मात्र संचारबंदीमुळे अडकून पडले होते. काही ठिकाणी ऊस शिल्लक असतानाही त्यांनी गावी जाण्याची भूमिका घेतली होती. मजूर संघटनेने शासनाकडे मजुरांना गावी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने १६ एप्रिलला परवानगी दिली. साखर कारखान्यांनी त्यानुसार ऊसतोड मजुरांना प्रत्येकाच्या गावी सुखरुप पोहोच केले.

राज्यातील गेले : राज्याबाहेरील थांबलेराजारामबापू साखर कारखान्याकडील १५ हजार मजुरांपैकी आंतरराज्य बंदीमुळे कर्नाटक राज्यातील ४०० आणि मध्यप्रदेशातील ६० ऊसतोड मजुरांना पाठविता आले नाही. उर्वरित राज्यातील सर्व मजुरांना सुखरुप गावी पाठविले आहे. जे आंतरराज्य मजूर आहेत, त्यांनाही धान्य दिले असून, गरजेनुसार लागेल त्या वस्तू कारखाना पुरवठा करीत आहे, अशी प्रतिक्रिया राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी दिली.

ऊसतोडणी मजुरांचे तांडे आता त्यांच्या गावाकडे परतु लागले आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरून बिड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर शनिवारी परतीच्या वाटेला लागले होते.

65रुपये प्रत्येक कारखान्यास मजुरांना गावी पोहोचविण्यासाठी खर्च आला आहे. मजूर आणणे आणि त्यांना गावी सोडण्याची जबाबदारी कारखान्यांचीच आहे.

2500मजूर कारखान्यांकडे आहेत. या मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय कारखाना प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने