शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

साठ हजारावर ऊसतोडणी मजूर परतले गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:49 IST

बहुतांशी मजूर बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर काही ऊसतोड मजुरांनी कारखान्यांना न सांगताच गुपचूप गाव जवळ केले होते. उर्वरित ऊसतोड मजूर मात्र संचारबंदीमुळे अडकून पडले होते.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी घेतला पुढाकार; कर्नाटक, मध्यप्रदेशातील अनेक मजूर मात्र अडकले

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संचारबंदी जाहीर केल्यामुळे जिल्ह्यात ६२ हजार ५०० ऊसतोड मजूर अडकून पडले होते. राज्य शासनाने या मजुरांना गावी पाठविण्यासाठी साखर कारखान्यांना परवानगी दिल्यानंतर ६० हजार मजूर गावी सुखरुप पोहोचले आहेत. आंतरराज्य बंदी कायम असल्यामुळे कर्नाटक, मध्यप्रदेशातील दोन हजार ५०० मजुरांना दि. ३ मेपर्यंत सांगली जिल्ह्यातच रहावे लागणार आहे.

जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांपैकी १२ कारखान्यांनीच यावर्षी गळीत हंगाम घेतले होते. या कारखान्यांकडे ६२ हजार ५०० ऊसतोड मजूर आले होते. बहुतांशी मजूर बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर काही ऊसतोड मजुरांनी कारखान्यांना न सांगताच गुपचूप गाव जवळ केले होते. उर्वरित ऊसतोड मजूर मात्र संचारबंदीमुळे अडकून पडले होते. काही ठिकाणी ऊस शिल्लक असतानाही त्यांनी गावी जाण्याची भूमिका घेतली होती. मजूर संघटनेने शासनाकडे मजुरांना गावी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने १६ एप्रिलला परवानगी दिली. साखर कारखान्यांनी त्यानुसार ऊसतोड मजुरांना प्रत्येकाच्या गावी सुखरुप पोहोच केले.

राज्यातील गेले : राज्याबाहेरील थांबलेराजारामबापू साखर कारखान्याकडील १५ हजार मजुरांपैकी आंतरराज्य बंदीमुळे कर्नाटक राज्यातील ४०० आणि मध्यप्रदेशातील ६० ऊसतोड मजुरांना पाठविता आले नाही. उर्वरित राज्यातील सर्व मजुरांना सुखरुप गावी पाठविले आहे. जे आंतरराज्य मजूर आहेत, त्यांनाही धान्य दिले असून, गरजेनुसार लागेल त्या वस्तू कारखाना पुरवठा करीत आहे, अशी प्रतिक्रिया राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी दिली.

ऊसतोडणी मजुरांचे तांडे आता त्यांच्या गावाकडे परतु लागले आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरून बिड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर शनिवारी परतीच्या वाटेला लागले होते.

65रुपये प्रत्येक कारखान्यास मजुरांना गावी पोहोचविण्यासाठी खर्च आला आहे. मजूर आणणे आणि त्यांना गावी सोडण्याची जबाबदारी कारखान्यांचीच आहे.

2500मजूर कारखान्यांकडे आहेत. या मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय कारखाना प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने