शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

चाळीस वर्षांत सहा पाणी योजना; पदरी मात्र निराशा : प्रशासनाचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:22 IST

गेल्या चाळीस वर्षात शासनाने आतापर्यंत पाच नळपाणी पुरवठा योजना, तसेच लोकसहभागातून सहावी जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबवली.

ठळक मुद्दे कोट्यवधीचा खर्च पाण्यात; टँकरवरही उधळण; पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ हैराण डफळापूरचा पाण्यासाठी टाहो

संजयकुमार गुरव ।डफळापूर : गेल्या चाळीस वर्षात शासनाने आतापर्यंत पाच नळपाणी पुरवठा योजना, तसेच लोकसहभागातून सहावी जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबवली. या सर्व योजनांसाठी करोडो रुपये खर्च झाले. लाखो रुपये टँकरसाठी शासनाने खर्च केले. परंतु डफळापूरकरांची कायमस्वरुपी पाण्याची तहान भागविण्यात प्रशासनाला आतापर्यंत अपयशच आले आहे. पाण्याबाबत शापित असलेले डफळापूरचे ग्रामस्थ भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत.

डफळापूर गावासाठी प्रथम मिरवाड तलावाद्वारे, तर दुसरी डफळापूर तलावाद्वारे या नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. लोकसंख्या वाढत गेल्याने व घरगुती कनेक्शन्स मोठ्या प्रमाणात देण्यात आल्याने हे पाणी अपुरे पडू लागले. ऐन उन्हाळ्यात हे दोन्ही तलाव कोरडे पडू लागल्याने या योजना कुचकामी ठरु लागल्याने डफळापूर गावाला गेल्या पंधरा वर्षात शासकीय व खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. आजही खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरुच आहे. टँकरने पाणी विकत घेण्याची सवयच लागली आहे.

बसप्पाचीवाडी तलावाद्वारे डफळापूर, अंकले, बाज, बेळुंखी, मिरवाड या पाच गावांसाठी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. पंधरा वर्षे झाली, आठ कोटी रुपयांची ही योजना अर्धवट स्थितीत राहिली. तलावात पाणी नसल्याने या योजनेला गती आली नाही. डफळापूरसाठी ही तिसरी पाणी पुरवठा योजना होती. अंतिम टप्प्यात काम बंद झाले. या योजनेसाठी शासनाचे सुमारे पाच कोटीचे नुकसान झाले.

डफळापूरसाठी चौथी पाणी पुरवठा योजना पाच किलोमीटर अंतरावरील खलाटी येथे राबविण्याचा प्रयत्न केला गेला. भारत निर्माण योजनेतून येथे विहीर खोदण्यात आली. परंतु विहिरीला मुबलक पाणी न लागल्यामुळे पाणी नसल्याने ही योजना ठप्प झाली. हीच योजना राष्ट्रीय पेयजल योजनेला वर्ग करुन डफळापूरसाठी पाचवी नळपाणी पुरवठा योजना बसप्पाचीवाडी तलावाद्वारे राबविण्यात येत आहे. अनेक अडथळे पार करत ही योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.

शासनाच्या पाणी पुरवठा योजनांवरील विश्वास उडाल्याने डफळापूरकरांनी लोकवर्गणीतून अकरा लाख रुपये खर्च करुन अवघ्या एकवीस दिवसात प्रा. रणजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच विहिरीतून जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबविली. तीन महिने ही योजना पूर्ण ताकतीने चालली. परंतु पाण्याअभावी योजना ठप्प झाली. जसे पाणी उपलब्ध होईल तसे ही योजना चालू राहणार असल्याचे प्रा. रणजित चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली