शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

चाळीस वर्षांत सहा पाणी योजना; पदरी मात्र निराशा : प्रशासनाचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:22 IST

गेल्या चाळीस वर्षात शासनाने आतापर्यंत पाच नळपाणी पुरवठा योजना, तसेच लोकसहभागातून सहावी जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबवली.

ठळक मुद्दे कोट्यवधीचा खर्च पाण्यात; टँकरवरही उधळण; पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ हैराण डफळापूरचा पाण्यासाठी टाहो

संजयकुमार गुरव ।डफळापूर : गेल्या चाळीस वर्षात शासनाने आतापर्यंत पाच नळपाणी पुरवठा योजना, तसेच लोकसहभागातून सहावी जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबवली. या सर्व योजनांसाठी करोडो रुपये खर्च झाले. लाखो रुपये टँकरसाठी शासनाने खर्च केले. परंतु डफळापूरकरांची कायमस्वरुपी पाण्याची तहान भागविण्यात प्रशासनाला आतापर्यंत अपयशच आले आहे. पाण्याबाबत शापित असलेले डफळापूरचे ग्रामस्थ भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत.

डफळापूर गावासाठी प्रथम मिरवाड तलावाद्वारे, तर दुसरी डफळापूर तलावाद्वारे या नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. लोकसंख्या वाढत गेल्याने व घरगुती कनेक्शन्स मोठ्या प्रमाणात देण्यात आल्याने हे पाणी अपुरे पडू लागले. ऐन उन्हाळ्यात हे दोन्ही तलाव कोरडे पडू लागल्याने या योजना कुचकामी ठरु लागल्याने डफळापूर गावाला गेल्या पंधरा वर्षात शासकीय व खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. आजही खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरुच आहे. टँकरने पाणी विकत घेण्याची सवयच लागली आहे.

बसप्पाचीवाडी तलावाद्वारे डफळापूर, अंकले, बाज, बेळुंखी, मिरवाड या पाच गावांसाठी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. पंधरा वर्षे झाली, आठ कोटी रुपयांची ही योजना अर्धवट स्थितीत राहिली. तलावात पाणी नसल्याने या योजनेला गती आली नाही. डफळापूरसाठी ही तिसरी पाणी पुरवठा योजना होती. अंतिम टप्प्यात काम बंद झाले. या योजनेसाठी शासनाचे सुमारे पाच कोटीचे नुकसान झाले.

डफळापूरसाठी चौथी पाणी पुरवठा योजना पाच किलोमीटर अंतरावरील खलाटी येथे राबविण्याचा प्रयत्न केला गेला. भारत निर्माण योजनेतून येथे विहीर खोदण्यात आली. परंतु विहिरीला मुबलक पाणी न लागल्यामुळे पाणी नसल्याने ही योजना ठप्प झाली. हीच योजना राष्ट्रीय पेयजल योजनेला वर्ग करुन डफळापूरसाठी पाचवी नळपाणी पुरवठा योजना बसप्पाचीवाडी तलावाद्वारे राबविण्यात येत आहे. अनेक अडथळे पार करत ही योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.

शासनाच्या पाणी पुरवठा योजनांवरील विश्वास उडाल्याने डफळापूरकरांनी लोकवर्गणीतून अकरा लाख रुपये खर्च करुन अवघ्या एकवीस दिवसात प्रा. रणजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच विहिरीतून जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबविली. तीन महिने ही योजना पूर्ण ताकतीने चालली. परंतु पाण्याअभावी योजना ठप्प झाली. जसे पाणी उपलब्ध होईल तसे ही योजना चालू राहणार असल्याचे प्रा. रणजित चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली