शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

खुनांच्या मालिकेने सांगली जिल्हा हादरला, चार आठवड्यांत सहा जणांचा खून

By घनशाम नवाथे | Updated: April 29, 2025 16:12 IST

खुनी हल्लेही वाढले : गुंडगिरीविरोधात कठोर पाऊल उचलण्याची गरज

घनशाम नवाथेसांगली : जिल्ह्यात गेल्या चार आठवड्यांत सहा जणांचा खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. यापैकी दोन गुंडांचा वैमनस्यातून खून झाला असून, तर चार खून वेगवेगळ्या कारणांतून झाले आहेत. सहा खून, तसेच काही ठिकाणी खुनी हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ‘भय इथले संपणार तरी कधी?’ असा सवाल विचारला जात आहे. वाढत्या गुंडगिरीविरोधात पोलिस आणखी कठोर पाऊल उचलणार कधी? याकडे लक्ष लागले आहे.इस्लामपूर येथे भरदिवसा बाजारात गुंडाचा खून झाला. याप्रकरणी दोघांना तातडीने अटक केली; परंतु भरदिवसा अनेकांनी हा थरार पाहिला, त्यांचा थरकाप उडाला. या खुनापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून इस्लामपूर येथे आणखी एका तरुणाचा खून झाला. कुपवाडजवळील सावळी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर नदाफ याचा पूर्ववैमनस्यातून खून झाला. मिरजेत मजुराचा त्याच्या मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केला. बेडग (ता. मिरज) येथे हॉटेलचालकानेच एकाला बेदम मारल्याने तो मृत झाला. त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. रेवनाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली.एकीकडे सहा खुनांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाली असतानाच खुनी हल्ल्याचे प्रकारही आष्टा, मिरज, इस्लामपूर, बुधगाव, कवठेपिरान आदी ठिकाणी घडले. त्यामुळे नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्यातून गुंडच एकमेकांना संपवत असले तरी यातून नवीन गुन्हेगारही उदयास येत आहेत. त्यामुळे भविष्यात गुंडगिरी फोफावू शकते.रेवनाळ येथील पत्नीचा केलेला खून वगळता इतर पाच खून वेगवेगळ्या वादातूनच झाले आहेत. पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वातून हे खून झाले आहेत. तसेच खुनी हल्ले देखील पूर्वीच्या वादातूनच झाले आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. चार आठवड्यांतील या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कारवाईत सातत्य हवेरेकॉर्डवरील गुन्हेगारांवर, तसेच पोलिस ठाणे हद्दीतील हालचालीवर पोलिसांचे सातत्याने लक्ष हवे. गुन्हेगारांना सतत कायद्याचा धाक राहिला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना सतत कारवाईच्या धाकात ठेवले पाहिजे. तरच त्यांच्या हालचाली थंडावतील.

हद्दपारी, स्थानबद्ध, मोकाच्या कारवाया हव्यातरेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. हद्दपारीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार स्थानबद्धतेच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. ‘मोका’च्या कचाट्यात गुन्हेगारांना जखडले पाहिजे. तरच त्यांच्यावर आणि साथीदारांवर वचक निर्माण होईल.

नशेखोरांचे अड्डे उद्ध्वस्त कराजिल्ह्यातील टास्क फोर्सने नशेखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे; परंतु अद्यापही गांजा, नशेच्या गोळ्यांची विक्री काही थांबलेली नाही. त्यामुळे नशेखोरीच्या मुळाशी जाऊन या गोष्टी सहजपणे मिळणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण नशा करून खून केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस