शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

खुनांच्या मालिकेने सांगली जिल्हा हादरला, चार आठवड्यांत सहा जणांचा खून

By घनशाम नवाथे | Updated: April 29, 2025 16:12 IST

खुनी हल्लेही वाढले : गुंडगिरीविरोधात कठोर पाऊल उचलण्याची गरज

घनशाम नवाथेसांगली : जिल्ह्यात गेल्या चार आठवड्यांत सहा जणांचा खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. यापैकी दोन गुंडांचा वैमनस्यातून खून झाला असून, तर चार खून वेगवेगळ्या कारणांतून झाले आहेत. सहा खून, तसेच काही ठिकाणी खुनी हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ‘भय इथले संपणार तरी कधी?’ असा सवाल विचारला जात आहे. वाढत्या गुंडगिरीविरोधात पोलिस आणखी कठोर पाऊल उचलणार कधी? याकडे लक्ष लागले आहे.इस्लामपूर येथे भरदिवसा बाजारात गुंडाचा खून झाला. याप्रकरणी दोघांना तातडीने अटक केली; परंतु भरदिवसा अनेकांनी हा थरार पाहिला, त्यांचा थरकाप उडाला. या खुनापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून इस्लामपूर येथे आणखी एका तरुणाचा खून झाला. कुपवाडजवळील सावळी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर नदाफ याचा पूर्ववैमनस्यातून खून झाला. मिरजेत मजुराचा त्याच्या मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केला. बेडग (ता. मिरज) येथे हॉटेलचालकानेच एकाला बेदम मारल्याने तो मृत झाला. त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. रेवनाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली.एकीकडे सहा खुनांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाली असतानाच खुनी हल्ल्याचे प्रकारही आष्टा, मिरज, इस्लामपूर, बुधगाव, कवठेपिरान आदी ठिकाणी घडले. त्यामुळे नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्यातून गुंडच एकमेकांना संपवत असले तरी यातून नवीन गुन्हेगारही उदयास येत आहेत. त्यामुळे भविष्यात गुंडगिरी फोफावू शकते.रेवनाळ येथील पत्नीचा केलेला खून वगळता इतर पाच खून वेगवेगळ्या वादातूनच झाले आहेत. पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वातून हे खून झाले आहेत. तसेच खुनी हल्ले देखील पूर्वीच्या वादातूनच झाले आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. चार आठवड्यांतील या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कारवाईत सातत्य हवेरेकॉर्डवरील गुन्हेगारांवर, तसेच पोलिस ठाणे हद्दीतील हालचालीवर पोलिसांचे सातत्याने लक्ष हवे. गुन्हेगारांना सतत कायद्याचा धाक राहिला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना सतत कारवाईच्या धाकात ठेवले पाहिजे. तरच त्यांच्या हालचाली थंडावतील.

हद्दपारी, स्थानबद्ध, मोकाच्या कारवाया हव्यातरेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. हद्दपारीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार स्थानबद्धतेच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. ‘मोका’च्या कचाट्यात गुन्हेगारांना जखडले पाहिजे. तरच त्यांच्यावर आणि साथीदारांवर वचक निर्माण होईल.

नशेखोरांचे अड्डे उद्ध्वस्त कराजिल्ह्यातील टास्क फोर्सने नशेखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे; परंतु अद्यापही गांजा, नशेच्या गोळ्यांची विक्री काही थांबलेली नाही. त्यामुळे नशेखोरीच्या मुळाशी जाऊन या गोष्टी सहजपणे मिळणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण नशा करून खून केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस