शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

खुनांच्या मालिकेने सांगली जिल्हा हादरला, चार आठवड्यांत सहा जणांचा खून

By घनशाम नवाथे | Updated: April 29, 2025 16:12 IST

खुनी हल्लेही वाढले : गुंडगिरीविरोधात कठोर पाऊल उचलण्याची गरज

घनशाम नवाथेसांगली : जिल्ह्यात गेल्या चार आठवड्यांत सहा जणांचा खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. यापैकी दोन गुंडांचा वैमनस्यातून खून झाला असून, तर चार खून वेगवेगळ्या कारणांतून झाले आहेत. सहा खून, तसेच काही ठिकाणी खुनी हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ‘भय इथले संपणार तरी कधी?’ असा सवाल विचारला जात आहे. वाढत्या गुंडगिरीविरोधात पोलिस आणखी कठोर पाऊल उचलणार कधी? याकडे लक्ष लागले आहे.इस्लामपूर येथे भरदिवसा बाजारात गुंडाचा खून झाला. याप्रकरणी दोघांना तातडीने अटक केली; परंतु भरदिवसा अनेकांनी हा थरार पाहिला, त्यांचा थरकाप उडाला. या खुनापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून इस्लामपूर येथे आणखी एका तरुणाचा खून झाला. कुपवाडजवळील सावळी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर नदाफ याचा पूर्ववैमनस्यातून खून झाला. मिरजेत मजुराचा त्याच्या मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केला. बेडग (ता. मिरज) येथे हॉटेलचालकानेच एकाला बेदम मारल्याने तो मृत झाला. त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. रेवनाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली.एकीकडे सहा खुनांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाली असतानाच खुनी हल्ल्याचे प्रकारही आष्टा, मिरज, इस्लामपूर, बुधगाव, कवठेपिरान आदी ठिकाणी घडले. त्यामुळे नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्यातून गुंडच एकमेकांना संपवत असले तरी यातून नवीन गुन्हेगारही उदयास येत आहेत. त्यामुळे भविष्यात गुंडगिरी फोफावू शकते.रेवनाळ येथील पत्नीचा केलेला खून वगळता इतर पाच खून वेगवेगळ्या वादातूनच झाले आहेत. पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वातून हे खून झाले आहेत. तसेच खुनी हल्ले देखील पूर्वीच्या वादातूनच झाले आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. चार आठवड्यांतील या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कारवाईत सातत्य हवेरेकॉर्डवरील गुन्हेगारांवर, तसेच पोलिस ठाणे हद्दीतील हालचालीवर पोलिसांचे सातत्याने लक्ष हवे. गुन्हेगारांना सतत कायद्याचा धाक राहिला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना सतत कारवाईच्या धाकात ठेवले पाहिजे. तरच त्यांच्या हालचाली थंडावतील.

हद्दपारी, स्थानबद्ध, मोकाच्या कारवाया हव्यातरेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. हद्दपारीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार स्थानबद्धतेच्या कारवाया वाढल्या पाहिजेत. ‘मोका’च्या कचाट्यात गुन्हेगारांना जखडले पाहिजे. तरच त्यांच्यावर आणि साथीदारांवर वचक निर्माण होईल.

नशेखोरांचे अड्डे उद्ध्वस्त कराजिल्ह्यातील टास्क फोर्सने नशेखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे; परंतु अद्यापही गांजा, नशेच्या गोळ्यांची विक्री काही थांबलेली नाही. त्यामुळे नशेखोरीच्या मुळाशी जाऊन या गोष्टी सहजपणे मिळणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण नशा करून खून केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस