शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण; सहा जण अटकेत, २५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:23 IST

कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण

मच्छिंद्र बाबरमाडग्याळ/सांगली : मोरबगी (ता. जत) येथे लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तराखंड येथील सहा साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काल, मंगळवारी घडली. या मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी लवंगा येथील सहा जणांना अटक तर, २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्तराखंड येथील सहा साधू मोटारीतून (क्र. यूके ०६ एएच ६१५२) प्रवास करीत विजापूरहून पंढरपूरकडे निघाले होते. मंगळवारी दुपारी मोरबगी येथे लवंगा व उमदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमदीकडे जाणारा चालकास रस्ता लक्षात आला नाही. यामुळे त्यांनी तेथे असलेल्या एका मुलाला जवळ बोलावून रस्ता विचारला. मात्र साधूंचा पोशाख पाहून घाबरलेल्या मुलाने रस्ता सांगण्याऐवजी आरडाओरडा सुरु केली.

मुलाच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण सुरू केली. साधूंनी विनवणी करूनही लोक शांत होत नव्हते. उमदी पोलिसांना फोनवरून माहिती देऊन 'तुम्ही लहान मुले पळवायला आलाय' असे म्हणत वाहनचालकासह सर्व साधूंना बेदम मारहाण केली. मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले.उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेशपोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन मारहाण होत असलेल्या साधूंना वाचवले व उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मारहाण प्रकरणी साधूंनी तक्रार देण्यास नकार देत निघून गेले. ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी कोल्हापूरचे विशेष पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.संशय आल्यास पोलिसांना माहिती द्या - पोलीस अधीक्षकलवंगा येथील सहा जणांना उमदी पोलिसांनी अटक करून सुमारे पंचविसजणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी परराज्यातील संशयीत व्यक्तीबाबत संशय आल्यास कायदा हातात कोणी न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

उमदी पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळलाघटनास्थळी उमदीचे पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब खरात वेळीच फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून साधूंना बाजुला घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची खातरजमा केल्याने अनर्थ टळला, अशी चर्चा होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी