शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण; सहा जण अटकेत, २५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:23 IST

कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण

मच्छिंद्र बाबरमाडग्याळ/सांगली : मोरबगी (ता. जत) येथे लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तराखंड येथील सहा साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काल, मंगळवारी घडली. या मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी लवंगा येथील सहा जणांना अटक तर, २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्तराखंड येथील सहा साधू मोटारीतून (क्र. यूके ०६ एएच ६१५२) प्रवास करीत विजापूरहून पंढरपूरकडे निघाले होते. मंगळवारी दुपारी मोरबगी येथे लवंगा व उमदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमदीकडे जाणारा चालकास रस्ता लक्षात आला नाही. यामुळे त्यांनी तेथे असलेल्या एका मुलाला जवळ बोलावून रस्ता विचारला. मात्र साधूंचा पोशाख पाहून घाबरलेल्या मुलाने रस्ता सांगण्याऐवजी आरडाओरडा सुरु केली.

मुलाच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण सुरू केली. साधूंनी विनवणी करूनही लोक शांत होत नव्हते. उमदी पोलिसांना फोनवरून माहिती देऊन 'तुम्ही लहान मुले पळवायला आलाय' असे म्हणत वाहनचालकासह सर्व साधूंना बेदम मारहाण केली. मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले.उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेशपोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन मारहाण होत असलेल्या साधूंना वाचवले व उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मारहाण प्रकरणी साधूंनी तक्रार देण्यास नकार देत निघून गेले. ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी कोल्हापूरचे विशेष पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.संशय आल्यास पोलिसांना माहिती द्या - पोलीस अधीक्षकलवंगा येथील सहा जणांना उमदी पोलिसांनी अटक करून सुमारे पंचविसजणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी परराज्यातील संशयीत व्यक्तीबाबत संशय आल्यास कायदा हातात कोणी न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

उमदी पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळलाघटनास्थळी उमदीचे पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब खरात वेळीच फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून साधूंना बाजुला घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची खातरजमा केल्याने अनर्थ टळला, अशी चर्चा होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी