शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्रांत,तहसीलदारांच्या समोर जयंत पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:25 IST

महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला.यावेळी विशेष म्हणजे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.

ठळक मुद्देप्रांत,तहसीलदारांच्या समोर जयंत पाटील यांचा इशारासामान्य जनतेची कामे न झाल्यास तुमच्या दारात येणार

इस्लामपूर: महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला.यावेळी विशेष म्हणजे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.७/१२ उताऱ्यातील ऑनलाइन नोंदीत झालेल्या चुका, रेशन धान्य मिळत नाही,जमीन खरेदीच्या नोंदी प्रलंबित आहेत,शेत जमिनीची मोजणी होत नाही यासारख्या तक्रारी शेतकरी आणि सामान्य जनतेकडून आल्या होत्या. त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी पी.आर.पाटील,तालुकाध्यक्ष विजय पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,युवकचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, जेष्ठ नेते विष्णुपंत शिंदे,बाळासाहेब पाटील,नेताजीराव पाटील उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले,सामान्य माणसाच्या कामात राजकारण करू नका.कोणतरी सांगते म्हणून,तर कुणा कडून पैसे घेऊन कामे करण्याची पद्धत बंद करा.प्रशासनाने न्याय्य पद्धतीने काम करावे.जनतेच्या महसूल खत्याविषयी तीव्र भावना आहेत.त्याची दखल घेत येत्या महिन्यात सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशी सूचना प्रशासनाला केली.

प्रांत नागेश पाटील यांनी,आलेल्या सर्व सूचनांवर गांभीर्याने विचार करून साम्यान नागरिकांना त्रास झाल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले.तसेच सर्व प्रलंबित कामे निर्गत करताना एका मदत कक्षाची स्थापना करून सर्वांच्या सहकार्याने काम करू असे स्पष्ट केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलTahasildarतहसीलदारSangliसांगली