शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Sangli Crime: पलूसमधील वृद्धाच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पाच लाखाची सुपारी अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:37 IST

पोलिसांनी पाचजणांना केली अटक

पलूस : बांबवडे (ता. पलूस) येथील अपघातात ठार झालेले विजय नाना कांबळे (वय ६२) यांचा अपघात नसून जमिनीच्या वादातून धडक देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पलूस येथील सुनील केशवराव घोरपडे (वय ५२) व अभयसिंह मोहनराव पाटील (४०) यांनी कांबळे यांना मारण्यासाठी तिघांना पाच लाखांची सुपारी दिल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. शुक्रवार (दि. २०) दुपारी तीन वाजता ही घटना घडली हाेती.मृत विजय कांबळे हे पलूस न्यायालयातील काम आटाेपून तहसील कार्यालय ते पोलिस ठाणे रस्त्यावरून निघाले हाेते. या दरम्यान एका अज्ञात माेटारीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हाेता. अपघाताचे प्रत्यक्षदर्शी जितेश सुरेश बनसोडे (रा. नागराळे) यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली होती.सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास करताना नंबरप्लेट नसलेली एक आलिशान माेटार कुंडलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याची माहिती समाेर आली. सीसीटीव्ही फुटेजची मदत व तांत्रिक तपासात भरधाव वेगाने जाणारी माेटार (एमएच ०९ डीएम ४०४१) कोल्हापूर येथील एका व्यक्तीची असल्याचे स्पष्ट झाले.त्या व्यक्तीची चाैकशी केली असता २०२१ मध्ये ही माेटार भवानीनगर (ता. वाळवा) येथील संग्राम राजेंद्र पाटील (वय २२) याला दोन लाखास गहाण दिल्याचे समाेर आले. संग्राम पाटील याला ताब्यात घेऊन कसून तपास केला असता त्याने कांबळे यांना धडक दिल्याची कबुली दिली. दरम्यान, पलूस येथील सुनील घोरपडे व अभयसिंह पाटील यांच्याशी संपर्काचे तांत्रिक पुरावे मोबाइल संपर्कावरून स्पष्ट झाले.तपासात कांबळे यांचा अपघात नसून सुपारी देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. विजय कांबळे याचा अभयसिंह पाटील व सुनील घोरपडे यांच्याशी कूळकायद्यातील बारा एकर जमिनीचा वाद हाेता. कांबळे वारंवार त्यांना पाेलिसांत खोटे गुन्हे दाखल करतो म्हणून धमकावत हाेते. यामुळे कांबळे यांना उचलून नेऊन किंवा धडक देऊन ठार मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी सुनील घोरपडे व अभयसिंह पाटील यांनी संग्राम पाटील याला दिली.

यानंंतर संग्रामने आपले मित्र रुतीक भोपाल पाटील (वय २२) व रोहन रमेश पाटील वय २४, दोघेही रा. घोगाव) यांना घेऊन विजय कांबळे याच्यावर पाळत ठेवली. २० जानेवारी राेजी कांबळे तहसील कार्यालय ते पाेलिस ठाणे रस्त्यावरून चालत जात असताना त्यांना माेटारीची धडक दिली.तांत्रिक व परिस्थितिजन्य पुरावे तपासून पाचही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दि. १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपनिरीक्षक सुरेंद्र धुमाळे, राजेश्री दुधाळे, हवालदार प्रवीण पाटील, दिलीप गोरे, राकेश भोपळे, गणी पठाण, संजय गलुगडे, प्रमोद साखरपे, प्रवीण मलमे, अमोल कदम यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस