शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

सांगलीतील चार माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत, मुंबईत झाला पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:33 IST

जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार धक्का देत सांगली जिल्ह्यात पक्ष मजबूत केला. चार माजी आमदारांसह, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी मुंबई येथे प्रवेश केला.माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी चार वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, निशिकांत पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप भाजपमधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू होत्या. अखेर मंगळवारी पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.तम्मनगौडा रवी पाटील भाजप नेते असून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आहेत. जतमधून त्यांना भाजपने विधानसभा उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आजच्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जाते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील.राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश सुरु झाले आहेत. या चार माजी आमदारांसह मुन्ना कुरणे, संग्राम जगताप, रणधीरसिंह नाईक, पलूसचे नीलेश येसुगडे, निवृत्ती शिंदे, प्रमोद सावंत, अनिल पाटील आदींनी पक्षप्रवेश केला.

जिल्हा मंत्रिपदापासून वंचित : अजित पवारपक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत सांगली जिल्ह्याला सातत्याने चांगली मंत्रिपदे मिळत होती. पण गेल्या काही वर्षांत राजकीय उलथापालथी झाल्या. जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला. आता भविष्यात फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीने राजकीय वाटचाल करु. प्रवेश केलेल्या नेत्यांना भविष्यात संधी देऊ.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार