शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

सांगलीतील चार माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत, मुंबईत झाला पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:33 IST

जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार धक्का देत सांगली जिल्ह्यात पक्ष मजबूत केला. चार माजी आमदारांसह, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी मुंबई येथे प्रवेश केला.माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी चार वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, निशिकांत पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप भाजपमधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू होत्या. अखेर मंगळवारी पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.तम्मनगौडा रवी पाटील भाजप नेते असून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आहेत. जतमधून त्यांना भाजपने विधानसभा उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आजच्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जाते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील.राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश सुरु झाले आहेत. या चार माजी आमदारांसह मुन्ना कुरणे, संग्राम जगताप, रणधीरसिंह नाईक, पलूसचे नीलेश येसुगडे, निवृत्ती शिंदे, प्रमोद सावंत, अनिल पाटील आदींनी पक्षप्रवेश केला.

जिल्हा मंत्रिपदापासून वंचित : अजित पवारपक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत सांगली जिल्ह्याला सातत्याने चांगली मंत्रिपदे मिळत होती. पण गेल्या काही वर्षांत राजकीय उलथापालथी झाल्या. जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला. आता भविष्यात फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीने राजकीय वाटचाल करु. प्रवेश केलेल्या नेत्यांना भविष्यात संधी देऊ.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार