शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:00 IST

विटा/खानापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार ...

विटा/खानापूर : कोल्हापूरच्याशिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा उच्चशिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. तत्पूर्वी आमदार सुहास बाबर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून उपकेंद्राची घोषणा आजच करावी, अशी मागणी सभागृहात केली होती. पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर खानापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला.शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी २०१३ पासून सर्वस्तरांतून पाठपुरावा सुरू होता. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने समिती स्थापन केली होती. या समितीने हे उपकेंद्र खानापूर येथे करावे, अशी शिफारस करणारा अहवाल विद्यापीठाला सादर केला होता. दिवंगत नेते अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, ‘सिनेट’चे सदस्य ॲड. वैभव पाटील यांनीही या उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला होता.आमदार बाबर यांनी बुधवारी विधानसभेत म्हणाले, विद्यापीठाच्या खानापूर उपकेंद्राची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत आता लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्राचा निर्णय आजच जाहीर करावा. हा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला.गायरान जमीन देण्याची तयारीचंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२४ला शासनाला मिळाला असून, या प्रस्तावानुसार खानापूर येथे उपकेंद्र करण्याचा निर्णय जाहीर करीत आहे. या उपकेंद्राला खानापूर येथील गट नं. ५७२/१ मधील ४२ हेक्टर ५६ आर गायरान जमीन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली.

घोषणेनंतर फटाक्यांची आतषबाजीनिर्णय जाहीर झाल्याचे समजताच विटा शहरासह खानापूर तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्ते व नागरिकांनी जल्लोष साजरा केला. आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

“दिवंगत नेते अनिल बाबर यांनी खानापूरला उपकेंद्र करण्याचा शब्द मतदारांना दिला होता. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर उपकेंद्र मंजुरीसाठी यश आले. खानापूरच्या उपकेंद्रामुळे दुष्काळी तालुक्यांना न्याय मिळाला आहे. मतदारांना दिलेला शब्द पाळू शकलो, याचा सार्थ अभिमान वाटतो.” - सुहास बाबर, आमदार, खानापूर

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठchandrakant patilचंद्रकांत पाटील