शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:00 IST

विटा/खानापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार ...

विटा/खानापूर : कोल्हापूरच्याशिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा उच्चशिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. तत्पूर्वी आमदार सुहास बाबर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून उपकेंद्राची घोषणा आजच करावी, अशी मागणी सभागृहात केली होती. पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर खानापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला.शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी २०१३ पासून सर्वस्तरांतून पाठपुरावा सुरू होता. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने समिती स्थापन केली होती. या समितीने हे उपकेंद्र खानापूर येथे करावे, अशी शिफारस करणारा अहवाल विद्यापीठाला सादर केला होता. दिवंगत नेते अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, ‘सिनेट’चे सदस्य ॲड. वैभव पाटील यांनीही या उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला होता.आमदार बाबर यांनी बुधवारी विधानसभेत म्हणाले, विद्यापीठाच्या खानापूर उपकेंद्राची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत आता लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्राचा निर्णय आजच जाहीर करावा. हा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला.गायरान जमीन देण्याची तयारीचंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२४ला शासनाला मिळाला असून, या प्रस्तावानुसार खानापूर येथे उपकेंद्र करण्याचा निर्णय जाहीर करीत आहे. या उपकेंद्राला खानापूर येथील गट नं. ५७२/१ मधील ४२ हेक्टर ५६ आर गायरान जमीन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली.

घोषणेनंतर फटाक्यांची आतषबाजीनिर्णय जाहीर झाल्याचे समजताच विटा शहरासह खानापूर तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्ते व नागरिकांनी जल्लोष साजरा केला. आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

“दिवंगत नेते अनिल बाबर यांनी खानापूरला उपकेंद्र करण्याचा शब्द मतदारांना दिला होता. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर उपकेंद्र मंजुरीसाठी यश आले. खानापूरच्या उपकेंद्रामुळे दुष्काळी तालुक्यांना न्याय मिळाला आहे. मतदारांना दिलेला शब्द पाळू शकलो, याचा सार्थ अभिमान वाटतो.” - सुहास बाबर, आमदार, खानापूर

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठchandrakant patilचंद्रकांत पाटील