शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

'सांगली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना भाजपबरोबरच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 15:40 IST

राज्यात कशीही महाविकास आघाडी झाली असली तरी, शिवसेनेचे सुहास बाबर त्यांच्या तीन सदस्यांसह भाजप बरोबर राहणार आहेत.

सांगली : राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगलीजिल्हा परिषदेत चालणार नाही, असा विश्वास जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेत शिवसेना भाजप बरोबर सत्तेत राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेची स्वप्ने पाहू नये, अशी टीकाही देशमुख यांनी केली. जिल्हा परिषदेत बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची होती. यावेळी संग्रामसिंह देशमुख बोलत होते.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच राज्यात झालेल्या सत्तांतराबद्दल भाजपच्या नेत्यांवर बोचरी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे 'मी पुन्हा येईन' असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणू नये, असा टोला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात लगावला.

या टीकेचा समाचार घेताना संग्रामसिंह देशमुख महणाले, राज्याच्या विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे समीकरण निर्माण करून सता स्थापन केली आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडी कार्यक्रम होईल. अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले असल्याने नव्याने निवडी होतील. सध्या भाजप, शिवसेना आणि अन्य आघाडी अशी सत्ता आहे. भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्षपद सेनेकडे आहे. नव्या निवडीवेळी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील समीकरण जिल्हा परिषदेत येऊ नये, अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

भविष्य काळातही योग्य पद्धतीने निवडी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यात कशीही महाविकास आघाडी झाली असली तरी, शिवसेनेचे सुहास बाबर त्यांच्या तीन सदस्यांसह भाजप बरोबर राहणार आहेत. बाबर यांच्या सदस्यांवर कुणी सत्ता स्थापनेचे गणित मांडू नये. अशी टीका देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर केली. तसेच 'मी पुन्हा येईन' या शब्दामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असून, तो प्रत्येकाने बाळगण्यास काहीच हरकत नाही, असेही त्यांनी यावेळी विरोधकांना सुनावले.

यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी. अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी पाटील, ब्रह्मदेव पडळकर, डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, अॅड. शांता कनुंजे, अरुण बालटे, कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई कारंडे, सरदार पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.