शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

'सांगली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना भाजपबरोबरच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 15:40 IST

राज्यात कशीही महाविकास आघाडी झाली असली तरी, शिवसेनेचे सुहास बाबर त्यांच्या तीन सदस्यांसह भाजप बरोबर राहणार आहेत.

सांगली : राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगलीजिल्हा परिषदेत चालणार नाही, असा विश्वास जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेत शिवसेना भाजप बरोबर सत्तेत राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेची स्वप्ने पाहू नये, अशी टीकाही देशमुख यांनी केली. जिल्हा परिषदेत बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची होती. यावेळी संग्रामसिंह देशमुख बोलत होते.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच राज्यात झालेल्या सत्तांतराबद्दल भाजपच्या नेत्यांवर बोचरी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे 'मी पुन्हा येईन' असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणू नये, असा टोला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात लगावला.

या टीकेचा समाचार घेताना संग्रामसिंह देशमुख महणाले, राज्याच्या विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे समीकरण निर्माण करून सता स्थापन केली आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडी कार्यक्रम होईल. अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले असल्याने नव्याने निवडी होतील. सध्या भाजप, शिवसेना आणि अन्य आघाडी अशी सत्ता आहे. भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्षपद सेनेकडे आहे. नव्या निवडीवेळी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील समीकरण जिल्हा परिषदेत येऊ नये, अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

भविष्य काळातही योग्य पद्धतीने निवडी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यात कशीही महाविकास आघाडी झाली असली तरी, शिवसेनेचे सुहास बाबर त्यांच्या तीन सदस्यांसह भाजप बरोबर राहणार आहेत. बाबर यांच्या सदस्यांवर कुणी सत्ता स्थापनेचे गणित मांडू नये. अशी टीका देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर केली. तसेच 'मी पुन्हा येईन' या शब्दामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असून, तो प्रत्येकाने बाळगण्यास काहीच हरकत नाही, असेही त्यांनी यावेळी विरोधकांना सुनावले.

यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी. अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी पाटील, ब्रह्मदेव पडळकर, डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, अॅड. शांता कनुंजे, अरुण बालटे, कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई कारंडे, सरदार पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.