शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सांगलीत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पाण्यासाठी शिमगा : काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांसह नागरिकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:05 IST

गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभाग ११, १५ मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करीत, बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांसह

ठळक मुद्देमहापालिकेवर घागर मोर्चाखेबूडकर यांनी नगरसेवकांसह शिष्टमंडळाला कार्यालयात नेऊन अधिकाºयांसमवेत बैठक घेतली

सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभाग ११, १५ मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करीत, बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांसह नागरिकांनी महापालिकेवर घागरमोर्चा काढला. महापालिकेच्या दारात मडकी फोडून जोरदार घोषणाबाजी करीत नागरिकांनी प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ शिमगा केला.

प्रभाग १५ मधील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण, पवित्रा केरीपाळे, आरती वळवडे, प्रभाग ११ च्या नगरसेविका शुभांगी साळुंखे, अमर निंबाळकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत महापालिकेच्या दारातच ठिय्या मारला. मंगेश चव्हाण म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून प्रभाग १५ मधील पत्रकारनगर, गणेशनगर, गारपीर चौक, विद्यानगर, सीतारामनगरसह सर्वच परिसरात पाण्याचा ठणठणाट सुरू आहे.

भाजप सत्तेवर आल्यापासून सत्ताधारी आणि प्रशासनाने पाण्याचा खेळखंडोबा सुरू केला आहे. गणेशोत्सवातही पाण्याची टंचाई होती. आता दसरा, दिवाळीच्या तोंडावरही हेच चित्र आहे. शुभांगी साळुंखे यांनीही प्रभाग ११ मधील पाणीटंचाईचा पाढा वाचला.

प्रशासनाच्यावतीने सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी आंदोलक व नगरसेवकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक महिलांनी त्यांना धारेवर धरले. आयुक्तांशीच चर्चा करण्याचा आग्रहही आंदोलकांनी धरला. अखेर आयुक्त खेबूडकर महापालिकेत आले. त्यांनाही घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. खेबूडकर यांनी नगरसेवकांसह शिष्टमंडळाला कार्यालयात नेऊन अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. यावेळी चव्हाण, पठाण, वळवडे आदींनी पाणी समस्यांबाबत अधिकाºयांना जाब विचारला.

याबाबत खेबूडकर म्हणाले, शहराला समान पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तीनही शहरात ४९ वॉल्व्ह शोधून काढले आहेत. ते कार्यान्वित केल्यानंतर पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघेल. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी मुलाणी यांनी माळबंगला येथील मुख्य वॉल्व्ह बदलण्याचे काम केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यावर खेबूडकर यांनी ते काम तात्काळ करण्याचे आदेश दिले.

शिवाय शहरातील गळती काढण्यासाठी टेंडर देऊन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे खेबूडकर यांनी आश्वासन दिले. प्रभाग १५ साठी माळबंगल्याऐवजी पुन्हा हिराबाग येथील पाणी टाक्यांतूनच पाणीपुरवठा करण्याची सूचना केली. यावेळी विपुल केरीपाळे, रवींद्र वळवडे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस