शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शेट्टी, सदाभाऊंचा गारुड्याचा खेळ बंद पाडू : अनिल घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 6:42 PM

खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गारूड्याच्या खेळाप्रमाणे शेतकऱ्यांची दिशाभूल करून कारखानदारांशी सेटलमेंट करीत आहेत. त्यांचा हा उद्योग बंद पाडला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी येथे दिला.

ठळक मुद्देगुजरात पॅटर्नप्रमाणे दरासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकणारशेगाव (जि. बुलडाणा) येथे दि. १२ डिसेंबर रोजी शेतकरी स्वातंत्र्य मेळावा घेणार मगच उसाची मागणी करा : नरोडे

सांगली ,दि. ११ : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गारूड्याच्या खेळाप्रमाणे शेतकऱ्यांची दिशाभूल करून कारखानदारांशी सेटलमेंट करीत आहेत. त्यांचा हा उद्योग बंद पाडला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी येथे दिला.

यापुढे गुजरात पॅटर्नप्रमाणे साखरेचे १०० टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, यासाठी १२ डिसेंबरपासून आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. परिषदेस स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य संजय कोले, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अनिल चव्हाण, अजित नरदे, जयपाल फराटे आदी प्रमुख उपस्थित होते.

घनवट म्हणाले की, खासदार शरद जोशींनी भाजपला पाठिंबा दिला म्हणून त्यांच्यावर टीका करून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटनांचा बाजार मांडला. आता हेच नेते भाजप सरकारमध्ये सत्तेला लाभ घेत आहेत.

सरकारमध्येच राहून साखर कारखानदारांबरोबर दराची तडजोड करणे म्हणजे गारूड्याच्या खेळाप्रमाणेच आहे. दरवर्षी गारूड्याचा खेळ करून हे नेते स्वत:चा स्वार्थ साधून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत आहेत.

यावर्षी शेट्टी, सदाभाऊ आणि रघुनाथदादा पाटील यांनी एफआरपी अधिक २०० रुपयांवर साखर कारखानदारांबरोबर तडजोड केली. या घोषणेनंतर काही कारखानदारांनी एफआरपीपेक्षाही ५०० ते ७०० रुपये जादा दराची घोषणा केली. यावरून तडजोडीत शेतकऱ्यांचे किती नुकसान हे नेते करीत आहेत हे दिसून येत आहे. या गारूड्यांचा हा खेळ यापुढे चालू देणार नाही.

गुजरात पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी साखरेची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी आणि बगॅस, मळीच्या उत्पन्नात कारखान्याचा खर्च भागवावा. शेतीच्या हमी भावाच्या प्रश्नावर शेतकरी स्वातंत्र्य मेळावा दि. १२ डिसेंबररोजी शेगाव (जि. बुलडाणा) येथे घेणार आहोत. या मेळाव्यात आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

संजय कोले म्हणाले की, गुजरातमधील साखर कारखान्यांना ४४४१ रुपये दर देण्यास परवडत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा साखर उतारा त्या कारखान्यांपेक्षा चांगला आहे. तरीही यांचा दर कमी असतो. याबद्दल लढा देण्याची गरज आहे. आमच्या मेळाव्यास शेतकरी येऊ नयेत, यासाठीही कारखानदार आणि काही संघटना प्रयत्न करीत आहेत.

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनाच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आहे. या संघटनेतून बाहेर पडलेल्या खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढलेल्या संघटना चायना मेड आहेत. भविष्यात या संघटनांचा खेळ बंद पडेल, अशी टीका संजय कोले यांनी केली.

सांगली जिल्हाध्यक्ष रामचंद्र कणसे, नवनाथ पोळ, युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अभिमन्यू शेलार, शंकर पुरकर, सुधीर बिंदू, सुरेश सरडे यांनीही सरकार आणि साखर कारखान्यांवर सडकून टीका केली. यावेळी परिसरातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

मगच उसाची मागणी करा : नरोडेमागील हंगामाला गेलेल्या उसाचे अंतिम बिल एकाही कारखान्याने दिले नाही. या हंगामासाठी जाणाऱ्या उसाच्या दराची तडजोड करताना संघटना आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांना फसविले.

प्रतिटन १५०० रुपयांचे म्हणजे प्रत्येकाचे सरासरी दीड लाखाचे नुकसान केले आहे. या पैशावर महिलांचाही तेवढाच हक्क असून, यातून येणाऱ्या पाच तोळे सोन्यावर कारखानदार वर्षाला डल्ला मारत आहेत.

या हंगामात महिलांनी, पाच तोळ्यांचा हिशेब दिल्याशिवाय तोडी घेणार नसल्याचा पवित्रा घेतला पाहिजे, अशी भूमिका महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे यांनी मांडली.ऊस परिषदेतील ठराव

  1. ऊस दरासंबंधी अन्य शेतकरी नेते आणि साखर कारखानदारांमधील तडजोड अमान्य
  2. उचलीत दोनशेची वाढ, मात्र अंतिम बिलातील कपातीचा निषेध
  3. रंगराजन् समितीच्या ऊसदरासाठी शिफारशी करू नयेत
  4. भाग विकास निधीसाठी कपाती करणे बंद करावे
  5. ऊस दर नियामक समितीमध्ये गुजरात पध्दतीने साखरेचे १०० टक्के ऊस दर देण्याचे सूत्र स्वीकारले जावे. यासाठी पुढील वर्षात प्रबोधन जागर आणि आंदोलन
  6. संगणकीय वजन-काट्याची व्यवस्था करावी
  7. शेतकऱ्यांना उसापासून तयार होणाऱ्या सर्व साखरेची रक्कम मिळावी
टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली