शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शांतीसागर महाराजांनी जैन धर्माची पताका देशभर फडकवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST

सांगली : आपल्या अलौकिक कार्याने आचार्य शांतीसागर महाराज यांनी देशभर जैन धर्माची पताका फडकवली, असे गौरवोद्गार पंचम पट्टाधीश प.पू. ...

सांगली : आपल्या अलौकिक कार्याने आचार्य शांतीसागर महाराज यांनी देशभर जैन धर्माची पताका फडकवली, असे गौरवोद्गार पंचम पट्टाधीश प.पू. १०८ आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी काढले.

दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य प. पू. १०८ श्री शांतिसागर महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी पार पडली. वीर सेवा दल व समस्त दिगंबर जैन समाज, कोथळी कुप्पनवाडी यांच्यावतीने ऑनलाईन सवांद आयोजित केला होता, अशी माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी सांगितले.

सकाळी १०८ णमोकार महामंत्राचे जाप्य व विश्वशांती प्रार्थना करण्यात आली. शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शांती दीपप्रज्वलन करण्यात आले. शांतिसागर महाराज यांनी त्यांच्याच मुखातून सल्लेखनाच्या २६ व्या दिवशी दिलेला अंतिम उपदेश वीर सेवा दल या फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आला. जन्मभूमी भोज येथून आलेल्या शांतिकलशाचे स्वागत करून धर्मानुरागी सुरेंद्र पिटके यांच्याहस्ते ध्वजारोहण होऊन वर्धमानसागर महाराज यांच्या व संघस्थ त्यागी, आर्यिका यांच्या पचांमृत अभिषेक करण्यात आला.

यावेळी वर्धमानसागर महाराज म्हणाले की, शांतिसागर महाराजांनी आपल्या विहारात जल आणि वायू यांचा त्याग केला. पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर पायी विहार करून सर्व अडचणींवर संयम व शांतीच्या मार्गाने मात करून जैन धर्माची पताका देशभर फिरविला. आयुष्यातील २७ वर्षांहून अधिक काळ उपवास करून तप साधना केली. वीर सेवा दल हे गेली ४० वर्षे प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करते ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व सामाजिक कार्य करीत आहे. ही परंपरा त्यांनी कायम ठेवावी.

या वेळी प.पू. १०८ हितेंद्रसागर महाराज, प.पू.स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक महाराज यांचे आशीर्वचन व महामंत्री बाळासाहेब पाटील, महावीर (राजस्थान), एन. जे. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत डॉ. रावसो कुन्नुरे, प्रास्ताविक भूपाल गिरमल यांनी केले. संयोजन राजू दोड्डण्णावर तर आभार मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी मानले. सूत्रसंचालन आर.बी खोत, अजित भंडे यांनी केले. शांतिकलशाचा मान अजित मडके व जलदकुमार पाटील यांना देण्यात आला. अध्यक्षस्थानी पी.आर. पाटील होते.