शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

सात नगरसेवकांनी केला भाजपचा ‘गेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या वर्षभरापासून कुरबुरी सुरू होत्या, पण भाजप नेते व कोअर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या वर्षभरापासून कुरबुरी सुरू होत्या, पण भाजप नेते व कोअर कमिटीने त्याची दखल घेतली नाही. नेमका त्याचाच फायदा राष्ट्रवादीने उचलला. भाजपच्या बारा नगरसेवकांना फोडण्यात यश मिळविले. त्यातील सात जणांनी अखेरपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहत महापालिकेतील भाजपच्या सत्तेचा ‘गेम’ केला. या नगरसेवकांची नाराजीच भाजप सत्तेच्या मुळावर घाव घालणारी ठरली.

महापालिकेत भाजपकडे ४१ नगरसेवकांचे बळ होते. त्याला दोन सहयोगी सदस्यांनी पाठिंबा दिल्याने भाजपच्या सत्तेचा वारू उधळला होता. त्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी स्वत:ला महापालिकेच्या राजकारणापासून अलिप्त ठेवले होते. सारा कारभार कोअर कमिटीच्या हातात होता. सत्तेवर येताच वर्षभरात कोअर कमिटीच्या नेत्यांनी आपल्याच नातेवाइकांना पदे दिली. तेव्हापासूनच कुरबुरींना सुरुवात झाली होती, पण कोअर कमिटीतील किंगमेकर, कारभाऱ्यांनी नगरसेवकांच्या असंतोषाची दखल घेतली नाही. उलट ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने त्यांना वागणूक दिली. त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले होते. नेमकी हीच बाब राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हेरली. त्यांनी मैनुद्दीन बागवान यांना कामाला लावले. हळूहळू भाजपची नाराज मंडळी राष्ट्रवादीच्या तंबू दिसू लागली. पण तरीही भाजपच्या नेत्यांनी आंधळेपणाचे सोंग घेतले. नगरसेवक कुठे जातात, असाच त्यांचा अहंभाव होता.

त्यातून महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसिमा नाईक, अपर्णा कदम, विजय घाडगे, आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे हे सात नगरसेवक शेवटपर्यंत भाजपच्या हाताला लागले नाहीत. महेंद्र सावंत व स्नेहल सावंत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. त्यामुळे ते सहजच राष्ट्रवादीच्या गळाला लागले. अपर्णा कदम पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या होत्या. त्यांना स्थायी समितीचे सदस्यपदही दिले होते, पण या काळात त्यांना कधीच सत्तेत आणि कामात वाटा मिळाला नाही. विजय घाडगे सहयोगी सदस्य असले तरी ते विशाल पाटील यांचे समर्थक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सत्तेचे गणित न जमल्याने ते भाजपसोबत आले होते. त्यांनाही सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे स्थायी समिती सभापतीपदासाठी दावेदार होते. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसा शब्द दिला होता, पण अडीच वर्षांत कधीच त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. देवमाने यांना इच्छा नसतानाही उपमहापौरपद देण्यात आले, तर दुर्वे यांना पदापासून वंचितच ठेवले होते. सहा महिन्यांपासून त्यांनी उघडपणे भाजपविरोधी भूमिका घेतली होती. याशिवाय अनेक सदस्य नाराज होते. पण त्यांना भाजप नेत्यांनी बेदखल केले होते. ही नाराजीच भाजपला भोवली.

चौकट

दिग्विजय सूर्यवंशींना लाॅटरी

काँग्रेस-राष्ट्रवादीतही सारे आलबेल नव्हते. राष्ट्रवादीत महापौरपदासाठी मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत चुरस होती. नगरसेवकांच्या फोडाफोडीपासून ते त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यापर्यंत सारे नियोजन बागवान यांनी केले होते. त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही आग्रह धरला होता. गेल्या बारा वर्षांत खुल्या गटातून महापौर झालेला नाही. त्यात नवीन चेहरा द्यावा, बागवान यांना महापौरपदाची संधी मिळाली आहे, असे मुद्दे समोर आले. अखेर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.