शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:44 IST

पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे.

सांगली : अलमट्टी धरणातपाणीसाठा किती ठेवायचा तो अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंपदाचे सचिव निर्णय घेतील. तोपर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार पाणीसाठा ठेवला जाईल, असे उत्तर अलमट्टीतील अधिकाऱ्यांनी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र जलसंपदा विभागाशी समन्वय असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे पदाधिकारी सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता सुकुमार पाटील, राकेश जगदाळे, संजय कोरे, प्रदीप वायचळ, धनाजी चुडमुंगे यांनी सोमवारी अलमट्टी धरण येथे भेट दिली. धरणाचे मुख्य अभियंता एच. सुरेश, कार्यकारी अभियंता संगमेश मुंडा यांची भेट घेतली. अलमट्टी धरणामुळेच कृष्णा नदीला पूर येत असून त्याचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसत आहे. पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे. धरणात पावसाळ्यात ५१२ मीटरपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवू नये, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांकडे केली.

यावर कर्नाटकचे मुख्य अभियंता एच. सुरेश आणि कार्यकारी अभियंता मुंडा म्हणाले की, अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा महापुराशी काही संबंध नाही. यासंबंधीचा अहवाल महाराष्ट्राच्या चौकशी समितीनेच दिला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्याबाबत कर्नाटकचे सचिव निर्णय घेतील. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमचा समन्वय आहे. या प्रश्नावर पुन्हा आणखी एक बैठक होणार आहे.

अलमट्टी धरणामुळेच कृष्णा नदीला पूर येत आहे. त्याचा फटका सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांना बसत आहे. अलमट्टीत सप्टेंबरपर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नको, अशी भूमिका कृती समितीने मांडली.

वडनेरे समितीकडून कर्नाटकला क्लीन चिट

महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे समितीनेच अलमट्टी धरण पूर्ण भरल्याने कृष्णा नदीला पूर येत नाही, असे अहवालात नमूद करत कर्नाटकला अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत क्लीन चिट दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मग, या धरणाचा कृष्णा नदीच्या महापुराशी कसा संबंध, असा सवालही अधिकाऱ्यांनी केला.

महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांतच समन्वयाचा अभाव

कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सदस्य कर्नाटक पाटबंधारे विभागाला जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत धरणातील पाणी सोडण्यात समन्वय नाही. यामुळेच पूर येत आहे, असे तेथील अधिकाऱ्यांनी सुनावले. या उत्तरावर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीfloodपूरKarnatakकर्नाटक