शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:44 IST

पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे.

सांगली : अलमट्टी धरणातपाणीसाठा किती ठेवायचा तो अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंपदाचे सचिव निर्णय घेतील. तोपर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार पाणीसाठा ठेवला जाईल, असे उत्तर अलमट्टीतील अधिकाऱ्यांनी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र जलसंपदा विभागाशी समन्वय असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे पदाधिकारी सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता सुकुमार पाटील, राकेश जगदाळे, संजय कोरे, प्रदीप वायचळ, धनाजी चुडमुंगे यांनी सोमवारी अलमट्टी धरण येथे भेट दिली. धरणाचे मुख्य अभियंता एच. सुरेश, कार्यकारी अभियंता संगमेश मुंडा यांची भेट घेतली. अलमट्टी धरणामुळेच कृष्णा नदीला पूर येत असून त्याचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसत आहे. पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे. धरणात पावसाळ्यात ५१२ मीटरपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवू नये, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांकडे केली.

यावर कर्नाटकचे मुख्य अभियंता एच. सुरेश आणि कार्यकारी अभियंता मुंडा म्हणाले की, अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा महापुराशी काही संबंध नाही. यासंबंधीचा अहवाल महाराष्ट्राच्या चौकशी समितीनेच दिला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्याबाबत कर्नाटकचे सचिव निर्णय घेतील. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमचा समन्वय आहे. या प्रश्नावर पुन्हा आणखी एक बैठक होणार आहे.

अलमट्टी धरणामुळेच कृष्णा नदीला पूर येत आहे. त्याचा फटका सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांना बसत आहे. अलमट्टीत सप्टेंबरपर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नको, अशी भूमिका कृती समितीने मांडली.

वडनेरे समितीकडून कर्नाटकला क्लीन चिट

महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे समितीनेच अलमट्टी धरण पूर्ण भरल्याने कृष्णा नदीला पूर येत नाही, असे अहवालात नमूद करत कर्नाटकला अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत क्लीन चिट दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मग, या धरणाचा कृष्णा नदीच्या महापुराशी कसा संबंध, असा सवालही अधिकाऱ्यांनी केला.

महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांतच समन्वयाचा अभाव

कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सदस्य कर्नाटक पाटबंधारे विभागाला जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत धरणातील पाणी सोडण्यात समन्वय नाही. यामुळेच पूर येत आहे, असे तेथील अधिकाऱ्यांनी सुनावले. या उत्तरावर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीfloodपूरKarnatakकर्नाटक