शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:44 IST

पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे.

सांगली : अलमट्टी धरणातपाणीसाठा किती ठेवायचा तो अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंपदाचे सचिव निर्णय घेतील. तोपर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार पाणीसाठा ठेवला जाईल, असे उत्तर अलमट्टीतील अधिकाऱ्यांनी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र जलसंपदा विभागाशी समन्वय असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे पदाधिकारी सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता सुकुमार पाटील, राकेश जगदाळे, संजय कोरे, प्रदीप वायचळ, धनाजी चुडमुंगे यांनी सोमवारी अलमट्टी धरण येथे भेट दिली. धरणाचे मुख्य अभियंता एच. सुरेश, कार्यकारी अभियंता संगमेश मुंडा यांची भेट घेतली. अलमट्टी धरणामुळेच कृष्णा नदीला पूर येत असून त्याचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसत आहे. पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे. धरणात पावसाळ्यात ५१२ मीटरपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवू नये, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांकडे केली.

यावर कर्नाटकचे मुख्य अभियंता एच. सुरेश आणि कार्यकारी अभियंता मुंडा म्हणाले की, अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा महापुराशी काही संबंध नाही. यासंबंधीचा अहवाल महाराष्ट्राच्या चौकशी समितीनेच दिला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्याबाबत कर्नाटकचे सचिव निर्णय घेतील. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमचा समन्वय आहे. या प्रश्नावर पुन्हा आणखी एक बैठक होणार आहे.

अलमट्टी धरणामुळेच कृष्णा नदीला पूर येत आहे. त्याचा फटका सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांना बसत आहे. अलमट्टीत सप्टेंबरपर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नको, अशी भूमिका कृती समितीने मांडली.

वडनेरे समितीकडून कर्नाटकला क्लीन चिट

महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे समितीनेच अलमट्टी धरण पूर्ण भरल्याने कृष्णा नदीला पूर येत नाही, असे अहवालात नमूद करत कर्नाटकला अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत क्लीन चिट दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मग, या धरणाचा कृष्णा नदीच्या महापुराशी कसा संबंध, असा सवालही अधिकाऱ्यांनी केला.

महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांतच समन्वयाचा अभाव

कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सदस्य कर्नाटक पाटबंधारे विभागाला जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत धरणातील पाणी सोडण्यात समन्वय नाही. यामुळेच पूर येत आहे, असे तेथील अधिकाऱ्यांनी सुनावले. या उत्तरावर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीfloodपूरKarnatakकर्नाटक