शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथतात्या केडगे यांचे निधन; सावळज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:14 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ तिप्पान्ना केडगे (वय ९२, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांचे बुधवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले.

सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ तिप्पान्ना केडगे (वय ९२, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांचे बुधवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. तत्पूर्वी त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले.

केडगेतात्या या नावाने ते सर्वत्र परिचित होते. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. २००७ मध्ये क्रांतिदिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. अत्यंत मितभाषी, निगर्वी आणि इतरांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर, अशी त्यांची ख्याती होती. २८ आॅगस्ट १९२७ रोजी त्यांचा जन्म झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणांनी प्रेरित होऊन ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. सातारा महाविद्यालयात शिक्षण घेणारे मित्र नरहरी चौगुले यांच्यामुळे ते सेवा दलाशीही जोडले गेले. लहानपणापासूनच क्रांतिगीते, प्रभातफेऱ्या, भूमिगत स्वातंत्र्यसेनानींना मदत, अशी कामे ते करीत असत. सायकलला कर्णा लावून ते जनजागृती करीत असत. १९४० च्या सुमारास सातारचे कलेक्टर सावळज दौºयावर येणार होते.

सावळजच्या शाळेत त्यांचा कार्यक्रम होणार होता. याची माहिती मिळताच तात्यांनी आपल्या सहकाºयांसह शाळेच्या खिडकीच्या काचा फोडून व गज कापून शाळेतील ब्रिटिशधार्जिणी चित्रे खरडून काढली होती. डोंगरसोनीच्या चावडीवर झेंडा फडकवून चावडीतील सहाव्या जॉर्जचे छायाचित्र रस्त्यावर भिरकावून दिले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, स्वामी रामानंद भारती, वि. स. पागे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळात काम केले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता. आर. आर. पाटील यांचे राजकीय गुरु म्हणून ते ओळखले जात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र केडगे, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेंद्र केडगे, पोलीस उपअधीक्षक यशवंत केडगे आणि सुभाष केडगे ही त्यांची मुले अत्यंत वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मिरज येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीत गुलमोहर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती. तेथे काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विनायक सिंहासने, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, चिक्कोडीचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संदीप सुतार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

मिरजेचे तहसीलदार शरद पाटील यांनी प्रशासनातर्फे श्रध्दांजली वाहिली. काँग्रेस कमिटीसमोर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अभिवादन केले. यानंतर सायंकाळी सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. यावेळी तासगावचे तहसीलदार दीपक वजाळे, कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे विधी शुक्रवार, दि. ७ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. 

 

टॅग्स :Sangliसांगली