शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी भाजप नेत्यांचे स्वार्थी राजकारण; जनतेकडूनच खिल्ली : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:32 IST

मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत.

ठळक मुद्देजनतेने फिरवली पाठ - भाजपच्या आंदोलनाची जनतेकडूनच खिल्ली

सांगली : कोरोनाच्या महाभयंकर संकटातही केवळ स्वार्थी राजकारण करीत आंदोलनाचे आवाहन करीत महाराष्ट्राबद्दल उसनं प्रेम दाखवत आंदोलनाचे नाटक करणारी भाजप उघडी पडली असून सामान्य जनता महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य जनतेने भाजपच्या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून सोशल मिडियावर तर या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे, असा टोला काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. 

 

ते म्हणाले की, भाजप नेते हे सत्तेविना तडफडत आहेत. वास्तविक कोरोनाबाबत सर्वाधिक गतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकीया राबवली आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधानांनी जाहीर करण्यापूर्वीच लाॅकडाऊनचा मार्ग स्विकारला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत. केवळ कामाचे प्रदर्शन न करता परिणामाकारक काम केले जात आहे. जनताही त्यावर समाधानी आहे. वास्तविक या संकटाने सारं जग अडचणीत आले आहे, अशावेळी महाराष्ट्रही त्याला बळी पडत आहे. मात्र महाआघाडी सरकार व प्रशासनाच्या अचूक नियोजन व कामामुळे बरीच हानी टाळता आली आहे.

इतक्या मोठ्या संकटात सरकार विरोधात कांगावा करीत बसण्यापेक्षा सरकारसोबत चर्चा करून प्रश्न कसे सोडवता येतील, काय करावे लागेल यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र भाजपला ते करायचेच नाही. प्रश्न अधिक कसे तयार होतील व आपल्याला त्यावर राजकीय पोळी कशी भाजता येईल याचाच प्रयत्न भाजप करीत आहे.

भाजपच्या या राजकीय खेळीला जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच मोजके कार्यकर्ते व पदाधिकारी वगळता सामान्य जनतेने याकडे पाहिलेसुद्धा नाही. सोशल मिडियावरही या भाजप आंदोलनास खडे बोल सुनावले आहेत. एकुणच जनतेनेच हे आंदोलन बेदखल केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcongressकाँग्रेस