शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

सत्तेसाठी भाजप नेत्यांचे स्वार्थी राजकारण; जनतेकडूनच खिल्ली : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:32 IST

मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत.

ठळक मुद्देजनतेने फिरवली पाठ - भाजपच्या आंदोलनाची जनतेकडूनच खिल्ली

सांगली : कोरोनाच्या महाभयंकर संकटातही केवळ स्वार्थी राजकारण करीत आंदोलनाचे आवाहन करीत महाराष्ट्राबद्दल उसनं प्रेम दाखवत आंदोलनाचे नाटक करणारी भाजप उघडी पडली असून सामान्य जनता महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य जनतेने भाजपच्या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून सोशल मिडियावर तर या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे, असा टोला काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. 

 

ते म्हणाले की, भाजप नेते हे सत्तेविना तडफडत आहेत. वास्तविक कोरोनाबाबत सर्वाधिक गतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकीया राबवली आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधानांनी जाहीर करण्यापूर्वीच लाॅकडाऊनचा मार्ग स्विकारला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत. केवळ कामाचे प्रदर्शन न करता परिणामाकारक काम केले जात आहे. जनताही त्यावर समाधानी आहे. वास्तविक या संकटाने सारं जग अडचणीत आले आहे, अशावेळी महाराष्ट्रही त्याला बळी पडत आहे. मात्र महाआघाडी सरकार व प्रशासनाच्या अचूक नियोजन व कामामुळे बरीच हानी टाळता आली आहे.

इतक्या मोठ्या संकटात सरकार विरोधात कांगावा करीत बसण्यापेक्षा सरकारसोबत चर्चा करून प्रश्न कसे सोडवता येतील, काय करावे लागेल यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र भाजपला ते करायचेच नाही. प्रश्न अधिक कसे तयार होतील व आपल्याला त्यावर राजकीय पोळी कशी भाजता येईल याचाच प्रयत्न भाजप करीत आहे.

भाजपच्या या राजकीय खेळीला जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच मोजके कार्यकर्ते व पदाधिकारी वगळता सामान्य जनतेने याकडे पाहिलेसुद्धा नाही. सोशल मिडियावरही या भाजप आंदोलनास खडे बोल सुनावले आहेत. एकुणच जनतेनेच हे आंदोलन बेदखल केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcongressकाँग्रेस