शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

सत्तेसाठी भाजप नेत्यांचे स्वार्थी राजकारण; जनतेकडूनच खिल्ली : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:32 IST

मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत.

ठळक मुद्देजनतेने फिरवली पाठ - भाजपच्या आंदोलनाची जनतेकडूनच खिल्ली

सांगली : कोरोनाच्या महाभयंकर संकटातही केवळ स्वार्थी राजकारण करीत आंदोलनाचे आवाहन करीत महाराष्ट्राबद्दल उसनं प्रेम दाखवत आंदोलनाचे नाटक करणारी भाजप उघडी पडली असून सामान्य जनता महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य जनतेने भाजपच्या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून सोशल मिडियावर तर या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे, असा टोला काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. 

 

ते म्हणाले की, भाजप नेते हे सत्तेविना तडफडत आहेत. वास्तविक कोरोनाबाबत सर्वाधिक गतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकीया राबवली आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधानांनी जाहीर करण्यापूर्वीच लाॅकडाऊनचा मार्ग स्विकारला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत. केवळ कामाचे प्रदर्शन न करता परिणामाकारक काम केले जात आहे. जनताही त्यावर समाधानी आहे. वास्तविक या संकटाने सारं जग अडचणीत आले आहे, अशावेळी महाराष्ट्रही त्याला बळी पडत आहे. मात्र महाआघाडी सरकार व प्रशासनाच्या अचूक नियोजन व कामामुळे बरीच हानी टाळता आली आहे.

इतक्या मोठ्या संकटात सरकार विरोधात कांगावा करीत बसण्यापेक्षा सरकारसोबत चर्चा करून प्रश्न कसे सोडवता येतील, काय करावे लागेल यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र भाजपला ते करायचेच नाही. प्रश्न अधिक कसे तयार होतील व आपल्याला त्यावर राजकीय पोळी कशी भाजता येईल याचाच प्रयत्न भाजप करीत आहे.

भाजपच्या या राजकीय खेळीला जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच मोजके कार्यकर्ते व पदाधिकारी वगळता सामान्य जनतेने याकडे पाहिलेसुद्धा नाही. सोशल मिडियावरही या भाजप आंदोलनास खडे बोल सुनावले आहेत. एकुणच जनतेनेच हे आंदोलन बेदखल केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcongressकाँग्रेस