शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

बियाणांचा काळाबाजार जोमात, ऐन हंगामामध्ये शेती अधिकारीच कोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:31 IST

इस्लामपूर येथील सोयाबीन बियाणे उत्पादकावर कृषी विभागाने मंगळवारी कारवाई केली. पण, अशा बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे.

अशोक डोंबाळे

सांगली : खरीप हंगाम सुरू झाला की बोगस बियाणे, रासायनिक खत आणि कीटकनाशक उत्पादकांचे पेव फुटते. नामांकित कंपन्यांच्या नावावर विक्री करून उत्पादक नामानिराळे होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गलेलठ्ठ पगार देऊन ठेवलेले अधिकारी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. भांडवलदार कंपन्यांपुढे टिकाव लागत नसल्यामुळे वर्षानुवर्षे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात खरिपाची सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. मान्सून पाऊस वेळेत येणार असल्यामुळे बियाणे, खते घेण्यासाठी गडबड सुरू आहे. ही वेळ साधून बोगस बियाणे, खते उत्पादकांनी बाजारात काळाबाजार सुरू केला आहे. इस्लामपूर येथील सोयाबीन बियाणे उत्पादकावर कृषी विभागाने मंगळवारी कारवाई केली. पण, अशा बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे.

‘हैदराबाद मेड’ पद्धतीच्या कीटकनाशकांची जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कृषी सल्लागारामार्फत थेट शेतकऱ्यांना ती विकली जातात. या कृषी सल्लागारांमध्ये काही कृषी विभागाचे अधिकारीच आहेत. याकडे कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर जात नाही. रासायनिक खतांमध्येही बोगसगिरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही नामांकित विक्रेत्यांकडूनही अशा खतांचा पुरवठा होत आहे. कृषी औषधे, खते आणि बियाणे विकणाऱ्या नामांकित दुकानांच्या तपासणीपूर्वीच अधिकाऱ्यांचा त्यांना ‘फोन’ जातो! मग शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, कीटकनाशके आणि खते कसे मिळणार, असा प्रश्न आहे.

जिल्ह्यासाठी आलेले खत कर्नाटकात

जिल्ह्यात डीएपीसह रासायनिक खताची टंचाई निर्माण होईल, असा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या परिस्थितीमध्ये जिल्ह्यासाठी आलेली रासायनिक खते मिरज तालुक्यातील सलगरेमार्गे कर्नाटकात जातात. सांगली शहरातील रासायनिक खतांचे काही मुख्य विक्रेतेच त्यात सामील आहेत. कृषी विभागाची भरारी पथके त्याकडे कानाडोळा करतात.

आटपाडी तालुक्यातील ९०४ शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?

आटपाडी तालुक्यातील ९०४ शेतकऱ्यांनी ३१८.९८ हेक्टर क्षेत्रात लागवड केलेले कापसाचे बियाणे बोगस असल्याने सुमारे २० कोटींचे नुकसान झाले होते. ही घटना २०१५ या वर्षातील आहे. या शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षांत एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. विधानसभेत लक्षवेधी होऊनही काही उपयोग झालेला नाही.

उन्हाळी सोयाबीन बियाण्यांतही फसवणूक

उन्हाळी सोयाबीन बियाण्यांतही वाळवा आणि पलूस तालुक्यातील १२५ हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सोयाबीन टोकण झाल्यानंतर रोपांना सोयाबीन आलेच नाही. कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी बियाणे निकृष्ट असल्याचा अहवाल दिला. पण, भरपाई कोण देणार, असा प्रश्न आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी बैठका घेऊनही कंपनी भरपाई देण्यासाठी फारशी इच्छुक नसल्याचे समजते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी