शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

विजयाचे शिल्पकार यंगस्टारच..निवडणुकीच्यादृष्टीने रोहितची मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 15:47 IST

हायटेक प्रचाराबरोबरच आर्थिक व्यवहारही सांभाळून त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबीयांच्यादृष्टीने २०१९ ची निवडणूक निर्णायक होती. यात त्यांच्या पत्नी सुमनतार्इंचे काय होणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती.

ठळक मुद्देइस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजयाचे शिल्पकारही युवकच ठरले.

अशोक डोंबाळे ।सांगली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजेत्यांच्या विजयाचे शिल्पकार तरुण चेहरे आहेत. वाळवा, तासगाव, खानापूर, मिरज, सांगली विधानसभा मतदार संघात आमदारांच्या मुलांनी निर्णायक प्रचार यंत्रणा हलविली आहे. हायटेक प्रचाराबरोबरच आर्थिक व्यवहारही सांभाळून त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक झाली. त्यांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक एकतर्फीच होती. त्यांच्या कुटुंबीयांच्यादृष्टीने २०१९ ची निवडणूक निर्णायक होती. यात त्यांच्या पत्नी सुमनतार्इंचे काय होणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती. आबांचे चिरंजीव रोहित यांनी निवडणुकीच्या आधी सहा महिने मतदारसंघ पिंजून काढला होता. निवडणुकीत प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विनम्रता आणि उत्कृष्ट भाषण कौशल्यावर त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासारखा तगडा उमेदवार असतानाही सुमनतार्इंना विक्रमी मतदानाने विजय मिळवून दिला. रोहितने काँग्रेसचे जतचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या मतदार संघातही सभा घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने रोहितची मशागत झाली आहे.

इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजयाचे शिल्पकारही युवकच ठरले. त्यांचे चिरंजीव प्रतीक व राजवर्धन पाटील यांनी प्रचार यंत्रणा राबविण्यापासून ते काही गावांतील गटा-गटांमध्ये मनोमीलन करुन त्यांना एकसंध करण्यात योगदान दिले. प्रत्येक गावापर्यंत ते पोहोचले होते. शेजारच्या शिराळा मतदार संघातील प्रचार यंत्रणेवरही त्यांनी लक्ष ठेवले होते. त्यांच्या बारकाव्यांमुळेच जयंत पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक यांचा विजय सोपा झाला. मानसिंगराव यांचे पुत्र विराज यांनीही प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती.

खानापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना चौथ्यावेळी आमदार करण्यात त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर व विट्याचे नगरसेवक अमोल बाबर यांचा मोठा वाटा आहे. खानापूर, आटपाडी या दोन तालुक्यांसह तासगाव तालुक्यातील २१ गावे खानापूर मतदार संघात येतात. मोठे क्षेत्र असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणेच त्यांच्यादृष्टीने मोठे आव्हान होते. तरीही दोन मुलांमुळेच बाबर यांना प्रचार यंत्रणा राबविण्यात फारशी अडचण आली नाही. आगामी निवडणुकीत चेहरा बदलण्याचीच वेळ आली, तर या दोघांचा पर्याय निर्माण झाला आहे.

जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या विजयातही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेले त्यांचे पुत्र धैर्यशील व पुतणे यश यांचा मोठा वाटा आहे. भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र प्रशांत यांनी सांभाळली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या या विजयात त्यांचे पुत्र सिध्दार्थ गाडगीळ यांचा वाटा आहे. व्यापारी वर्गासह सुशिक्षित घटकांना भाजपकडे खेचण्यात यश मिळविले.

पलूस-कडेगावचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा विक्रमी मताने विजय खेचून आणण्यात बंधू शांताराम कदम, पुतणे जितेश कदम आणि भाचे ऋषिकेश लाड यांचा वाटा आहे. विश्वजित कदम राज्यभर प्रचार दौऱ्यावर असताना मतदार संघातील प्रचाराची धुरा तरूण चेहऱ्यांनीच सांभाळली.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक