शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सोनवडे परिसरात गव्यांचा धुमाकूळ; :नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 7:03 PM

शिराळा तालुक्यातील सोनवडे, मणदूर, काळोखेवाडीत धूळवाफेच्या भात पेरणीची धांदल उडाली आहे. पण गव्यांच्या वावरामुळे शेतकºयांत घबराटीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देवन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

वारणावती : शिराळा तालुक्यातील सोनवडे, मणदूर, काळोखेवाडी येथील शिवारात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. सध्या शिवारात धूळवाफेच्या भात पेरणीची धांदल उडाली आहे. पण गव्यांच्या वावरामुळे शेतकºयांत घबराटीचे वातावरण आहे. गव्यांच्या भीतीने भात पेरणी व मशागतीची कामे खोळंबली आहेत. गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी लोकांची मागणी आहे.

सोनवडे येथील काळा डोह परिसरातील उसाच्या शेतात एक गवा लपून बसला होता. गुरुवारी पांडुरंग पाटील, भगवान पाटील, रामचंद्र नाईक शेतात काम करीत असताना अचानक हा गवा उसातून बाहेर आला. शेतात काम करणाºयांनी आरडाओरडा करून तेथून पळ काढला.

तसेच शुक्रवारी सकाळी आठ ते नऊ वाजता सोनवडे व मणदूर येथील उसाच्या शिवारात मणदूरच्या शेतकºयांनी गव्यांचा कळप पाहिला. त्यांनी आरडाओरडा करून गव्यांना हुसकावून लावले. ओढ्यात लपलेल्या गव्यांनी हुतात्मा नानकसिंग विद्यालयातील आंब्याच्या बागेत आश्रय घेतला. त्यानंतर विद्यालयातील आंब्याच्या बागेत कामगार व तुकाराम पाटील आंबे काढत असताना अचानक त्यांना ओढाकाठाजवळ पाच-सहा गव्यांचा कळप दिसला अन् त्यांची बोबडीच वळली. त्यांनी आरडाओरडा केल्यावर गव्यांचा कळप ओढ्यातून काळोखेवाडीच्या दिशेने डोंगर-दºयातून मिरुखेवाडीकडे निघून गेला.

सध्या शिवारात धूळवाफेच्या भाताची पेरणी व पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. अबाल-वृध्द शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशातच गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग