शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 20:18 IST

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या ...

ठळक मुद्दे सांगलीत ‘समाजभूषण’ पुरस्काराने आमटे दाम्पत्याचा सन्मानआवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणण्यात यश आल्याचे समाधान काही वेगळेच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शुक्रवारी सांगलीत केले.

अ‍ॅड. जे. जे. पाटील फौडेंशनच्यावतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते, तसेच आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. शुभम हिरेमठ यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली.

प्रकाश आमटे यांनी बाबा आमटे यांनी उभारलेले कार्य, तसेच हेमलकसा येथील सेवाकार्याचे अनुभव कथन केले. नद्या, जंगल सुंदर वाटत असले तरी, तेथे राहणारे आदिवासी अन्न, वस्त्राविना राहतात. जे मिळेल ते खातात. या आदिवासींना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न बाबांनी पाहिले. तसा शब्द मी बाबांना दिला. कुठलीही तक्रार न करता आम्ही हे कार्य हाती घेतले.

हेमलकसाला गेल्यावर अनेक अडचणींना समोरे जावे लागले. रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही की घर नाही. कुठल्याही सुविधा नसताना कामाला सुरूवात केली. आदिवासींची भाषा शिकलो. त्यांचा विश्वास संपादन केला. त्याला मंदाकिनी आमटे यांची साथ मिळाली. मराठवाड्यातूनही काहीजण सोबत आले. आपल्यादृष्टीने अंधश्रद्धा असलेल्या अनेक गोष्टी आदिवासींसाठी श्रद्धेच्या होत्या. शिकारीपासून परावृत्त करून वन्यप्राण्यांवर प्रेम करण्यास शिकविले. शेती व्यवसाय सुरू केला. आरोग्य शिक्षणातून त्यांच्यात आत्मियता निर्माण केली. त्यातून खूप मोठे परिवर्तन करण्यात यश आल्याचेही ते म्हणाले.

आवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

यावेळी गणेश गाडगीळ, डॉ. दिलीप पटवर्धन, महापौर खोत यांचीही भाषणे झाली. संजय परमणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास माजी आमदार प्रा. शरद पाटील, फौंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह एच. वाय. पाटील, अ‍ॅड. पंडित सावंत, अ‍ॅड. उत्तमराव निकम उपस्थित होते.

 

..म्हणून पद्मश्री परत करणार होतो

पद्मश्री पुरस्कार देताना मी आदिवासींसाठी केलेल्या कामासोबतच वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची दखल घेतली गेली होती. पण नंतर वन्यप्राणी जप्तीची नोटीस पाठविण्यात आली. शासन अथवा खासगी व्यक्ती वन्यप्राणी पाळू शकत नाहीत, हा नियम आहे. त्यासाठी मला केअरटेकर म्हणून नियुक्त करा, अशी विनंती सरकारला केली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ज्या कारणासाठी पद्मश्री दिला गेला, तेच काम काढून घेणार असाल, तर पद्मश्री परत करू, असे सांगितले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही आमटे म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली