शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 20:18 IST

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या ...

ठळक मुद्दे सांगलीत ‘समाजभूषण’ पुरस्काराने आमटे दाम्पत्याचा सन्मानआवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणण्यात यश आल्याचे समाधान काही वेगळेच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शुक्रवारी सांगलीत केले.

अ‍ॅड. जे. जे. पाटील फौडेंशनच्यावतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते, तसेच आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. शुभम हिरेमठ यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली.

प्रकाश आमटे यांनी बाबा आमटे यांनी उभारलेले कार्य, तसेच हेमलकसा येथील सेवाकार्याचे अनुभव कथन केले. नद्या, जंगल सुंदर वाटत असले तरी, तेथे राहणारे आदिवासी अन्न, वस्त्राविना राहतात. जे मिळेल ते खातात. या आदिवासींना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न बाबांनी पाहिले. तसा शब्द मी बाबांना दिला. कुठलीही तक्रार न करता आम्ही हे कार्य हाती घेतले.

हेमलकसाला गेल्यावर अनेक अडचणींना समोरे जावे लागले. रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही की घर नाही. कुठल्याही सुविधा नसताना कामाला सुरूवात केली. आदिवासींची भाषा शिकलो. त्यांचा विश्वास संपादन केला. त्याला मंदाकिनी आमटे यांची साथ मिळाली. मराठवाड्यातूनही काहीजण सोबत आले. आपल्यादृष्टीने अंधश्रद्धा असलेल्या अनेक गोष्टी आदिवासींसाठी श्रद्धेच्या होत्या. शिकारीपासून परावृत्त करून वन्यप्राण्यांवर प्रेम करण्यास शिकविले. शेती व्यवसाय सुरू केला. आरोग्य शिक्षणातून त्यांच्यात आत्मियता निर्माण केली. त्यातून खूप मोठे परिवर्तन करण्यात यश आल्याचेही ते म्हणाले.

आवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

यावेळी गणेश गाडगीळ, डॉ. दिलीप पटवर्धन, महापौर खोत यांचीही भाषणे झाली. संजय परमणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास माजी आमदार प्रा. शरद पाटील, फौंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह एच. वाय. पाटील, अ‍ॅड. पंडित सावंत, अ‍ॅड. उत्तमराव निकम उपस्थित होते.

 

..म्हणून पद्मश्री परत करणार होतो

पद्मश्री पुरस्कार देताना मी आदिवासींसाठी केलेल्या कामासोबतच वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची दखल घेतली गेली होती. पण नंतर वन्यप्राणी जप्तीची नोटीस पाठविण्यात आली. शासन अथवा खासगी व्यक्ती वन्यप्राणी पाळू शकत नाहीत, हा नियम आहे. त्यासाठी मला केअरटेकर म्हणून नियुक्त करा, अशी विनंती सरकारला केली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ज्या कारणासाठी पद्मश्री दिला गेला, तेच काम काढून घेणार असाल, तर पद्मश्री परत करू, असे सांगितले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही आमटे म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली