शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 20:18 IST

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या ...

ठळक मुद्दे सांगलीत ‘समाजभूषण’ पुरस्काराने आमटे दाम्पत्याचा सन्मानआवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणण्यात यश आल्याचे समाधान काही वेगळेच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शुक्रवारी सांगलीत केले.

अ‍ॅड. जे. जे. पाटील फौडेंशनच्यावतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते, तसेच आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. शुभम हिरेमठ यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली.

प्रकाश आमटे यांनी बाबा आमटे यांनी उभारलेले कार्य, तसेच हेमलकसा येथील सेवाकार्याचे अनुभव कथन केले. नद्या, जंगल सुंदर वाटत असले तरी, तेथे राहणारे आदिवासी अन्न, वस्त्राविना राहतात. जे मिळेल ते खातात. या आदिवासींना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न बाबांनी पाहिले. तसा शब्द मी बाबांना दिला. कुठलीही तक्रार न करता आम्ही हे कार्य हाती घेतले.

हेमलकसाला गेल्यावर अनेक अडचणींना समोरे जावे लागले. रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही की घर नाही. कुठल्याही सुविधा नसताना कामाला सुरूवात केली. आदिवासींची भाषा शिकलो. त्यांचा विश्वास संपादन केला. त्याला मंदाकिनी आमटे यांची साथ मिळाली. मराठवाड्यातूनही काहीजण सोबत आले. आपल्यादृष्टीने अंधश्रद्धा असलेल्या अनेक गोष्टी आदिवासींसाठी श्रद्धेच्या होत्या. शिकारीपासून परावृत्त करून वन्यप्राण्यांवर प्रेम करण्यास शिकविले. शेती व्यवसाय सुरू केला. आरोग्य शिक्षणातून त्यांच्यात आत्मियता निर्माण केली. त्यातून खूप मोठे परिवर्तन करण्यात यश आल्याचेही ते म्हणाले.

आवाडे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित वर्गाची आमटे परिवारांनी सेवा केली. बाबा आमटे यांची परंपरा कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. दुर्लक्षित व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

यावेळी गणेश गाडगीळ, डॉ. दिलीप पटवर्धन, महापौर खोत यांचीही भाषणे झाली. संजय परमणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास माजी आमदार प्रा. शरद पाटील, फौंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह एच. वाय. पाटील, अ‍ॅड. पंडित सावंत, अ‍ॅड. उत्तमराव निकम उपस्थित होते.

 

..म्हणून पद्मश्री परत करणार होतो

पद्मश्री पुरस्कार देताना मी आदिवासींसाठी केलेल्या कामासोबतच वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची दखल घेतली गेली होती. पण नंतर वन्यप्राणी जप्तीची नोटीस पाठविण्यात आली. शासन अथवा खासगी व्यक्ती वन्यप्राणी पाळू शकत नाहीत, हा नियम आहे. त्यासाठी मला केअरटेकर म्हणून नियुक्त करा, अशी विनंती सरकारला केली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ज्या कारणासाठी पद्मश्री दिला गेला, तेच काम काढून घेणार असाल, तर पद्मश्री परत करू, असे सांगितले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही आमटे म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली