शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 19:16 IST

राष्ट्रवादी पुनर्वसन करणार का? 

दत्ता पाटीलतासगाव : माजी खासदार संजयकाका पाटील सध्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करायचे आहे, असे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले होते. त्यामुळे संजय काकांच्या भाजप वापसी बाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे पडसाद तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमटणार आहेत. या मतदारसंघात संजय काकांच्या कार्यकर्त्यांची भूमिका ''काका म्हणतील तेच धोरण'', अशी राहिलेली आहे. त्यामुळे जी भूमिका संजयकाका घेतील तीच भूमिका कार्यकर्ते पार पाडतील हा इतिहास आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर संजयकाकांनी भाजपच्या वापसीसाठी प्रयत्न केले होते. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजयकाकांच्या घर वापसीला सोमवारी ब्रेक लावला. त्यामुळे संजयकाकांची आगामी राजकीय वाटचाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सुरू राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

तसे झाल्यास भाजपसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाटचाल बिकट होणार आहे. यापूर्वी माजी खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. तासगाव नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला होता. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत देखील भाजपची सत्ता आहे.

मात्र येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलली, तर भाजपला अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कार्यकारणीत काका समर्थकांचा समावेश नाही. बहुतांश निवडी करताना जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे संजय काका गटाची आजवरची राजकीय वाटचाल ''काका म्हणतील तेच धोरण'' या पद्धतीने राहिली आहे. त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटतील, हे नक्की.

राष्ट्रवादी पुनर्वसन करणार का? तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठी राजकीय उलथापालथ झाली. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्याचवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही पाटील यांना पाठिंबा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय काकांना निवडून दिल्यानंतर घोरपडे यांना विधानपरिषद देण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ''एक मत दोन आमदार'' असा जोरदार प्रचारही झाला होता. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुनर्वसनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीकडून संजय काकांचे पुनर्वसन होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माजी खासदार संजय पाटील यांनी मागील दहा वर्षात खासदारकीच्या काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याची भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीत तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यात काही प्रमाणात संभ्रमावस्था आहे. मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमच्यासाठी संजयकाका सांगतील तेच धोरण अंतिम असेल. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संजयकाका लवकरच भूमिका स्पष्ट करतील. - सुनील जाधव, माजी तालुकाध्यक्ष, भाजपा.

टॅग्स :Sangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळPoliticsराजकारणsanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा