शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

सांगलीच्या जिल्हा कारागृहाची सुरक्षितता धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:26 PM

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती. वाढलेली लोकवस्ती व गर्दीमुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कारागृह स्थलांतराचा प्रश्न अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. सुरक्षेचा भार पेलताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दररोज तारेवरची कसरत सुरु आहे. त्याला एक पर्याय म्हणून कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती. वाढलेली लोकवस्ती व गर्दीमुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कारागृह स्थलांतराचा प्रश्न अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. सुरक्षेचा भार पेलताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दररोज तारेवरची कसरत सुरु आहे. त्याला एक पर्याय म्हणून कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.राजवाडा चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कारागृह आहे. येथे न्यायालयीन कोठडीतील कच्चे कैदी ठेवले जातात. तसेच एक-दोन वर्षे शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. २३५ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या ३८० कैदी आहेत. कारागृह परिसरात लोकवस्ती नसावी, असा नियम आहे. पण हा नियम कागदावरच राहिला. त्यामुळे कारागृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्याचा परिणाम सुरक्षेवर झाला आहे. इमारतींमधील घरांतून कारागृहात काय सुरु आहे, हे स्पष्टपणे दिसते. पटवर्धन हायस्कूलच्या छतावरुनही कारागृहात डोकावून पाहता येते. शिवाजी मंडईतून कारागृहाची संरक्षक भिंत दिसते. सुरक्षा रक्षकासाठी उभा केलेला ‘टॉवर’ही दिसतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मध्यंतरी कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यावेळी बोरवणकर यांनी हे कारागृह स्थलांतर करण्याची गरज असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पण त्याबाबत शासनदरबारी हालचाली झाल्या नाहीत. त्यांच्यावर २४ तास डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागत आहे. याला पर्याय म्हणून संपूर्ण कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. हा उपायही तोकडा पडत असल्याने संरक्षक भिंतीवर तारेचे कुंपण मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे.कवलापूरचा प्रस्ताव धूळ खातजिल्हा कारागृह हलविण्याबाबत चर्चा झाली. कवलापूर (ता. मिरज) येथील माळावरील जागा निश्चित करण्यात आली. मीरा बोरवणकर यांनीही कवलापूरच्या जागेला पसंती दिली. स्थलांतराचा हा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविला आहे. पण शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.कर्मचाºयांची कसरतसुरक्षेचा भार पेलताना अधिकारी, कर्मचाºयांना कसरत करावी लागत आहे. तसेच कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कामाचा ताणही वाढला आहे. सुरक्षा व कैद्यांच्या संख्येमुळे ते कारागृह अन्यत्र स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.