शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक ६० मतदारसंघांनुसारच होणार, पण.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:28 IST

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात ...

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात लगबग सुरु झाली असून, त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे इतर मागासवर्गीयांच्या जुन्या म्हणजे २०२२ पूर्वीच्या आरक्षणानुसारच या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेसह १० पंचायत समित्या, महापालिका, ६ नगरपालिका आणि दोन नगरपंचायत्यांच्या निवडणुकांचे धुमशान रंगणार आहे. जुने आरक्षण व जुनेच गट यानुसार निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेले जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गणांचे आरक्षण स्वाभाविकरित्या रद्द झाले आहे.२०२२मध्ये बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या संदिग्धतेमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. तेथे प्रशासकांमार्फतच कामकाज सुरू आहे. पण, तेथे आता २०२०च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत.जिल्हा परिषदेची मुदत २० मार्च २०२२ रोजी, तर पंचायत समित्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. ओबीसी आरक्षण, मतदारसंघांची पुनर्रचना आदी कारणांनी निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नव्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकार आग्रही होते. मंत्रिमंडळात तसा निर्णय झाला. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

आटपाडीत घटला, खानापुरात वाढलामहाविकास आघाडी सरकारनेही जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना करत मतदारसंघ वाढविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ६८ मतदारसंघ आणि पंचायत समित्यांचे १३६ गण झाले होते. कडेगाव आणि कवठेमहांकाळवगळता उर्वरित आठ तालुक्यांत जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढला होता. पण, हा सर्व खटाटोप आता रद्दबातल झाला आहे.जुन्या गट आणि गणांनुसारच निवडणुका होणार आहेत. म्हणजे या निवडणुकीत ६० गट आणि १२० गण असतील. आटपाडी नगरपंचायत झाल्याने तो गट रद्द होणार आहे. या तालुक्यात ३ गट राहतील. खानापूर तालुक्यात एक गट वाढून ४ मतदारसंघ होतील. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या ६८ गटांच्या हिशेबाने आरक्षण सोडती काढण्यात आल्या होत्या. त्या आता रद्द होणार असून, जुन्या ६० गटांनुसार नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे.

उमेदवारांनी सोडला सुटकेचा निश्वासमतदारसंघ आणि आरक्षण निश्चित नसल्याने इच्छुक उमेदवारांत संभ्रमावस्था होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही सर्व संभ्रमावस्था संपवली आहे. जुनेच मतदारसंघ आणि आरक्षण कायम राहणार असल्याने उमेदवारांना आता आपले मतदारसंघ निवडता येतील. प्रचाराची दिशा निश्चित करून यंत्रणा कार्यान्वित करता येईल.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका २०११च्या जनगणनेनुसार होतील. त्यामुळे गट आणि गणांची पुनर्रचना करावी लागेल. याबाबत शासनस्तरावर प्रक्रिया राबवावी लागणार आहे. - ॲड. बाबासाहेब मुळीक

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024