शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक ६० मतदारसंघांनुसारच होणार, पण.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:28 IST

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात ...

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात लगबग सुरु झाली असून, त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे इतर मागासवर्गीयांच्या जुन्या म्हणजे २०२२ पूर्वीच्या आरक्षणानुसारच या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेसह १० पंचायत समित्या, महापालिका, ६ नगरपालिका आणि दोन नगरपंचायत्यांच्या निवडणुकांचे धुमशान रंगणार आहे. जुने आरक्षण व जुनेच गट यानुसार निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेले जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गणांचे आरक्षण स्वाभाविकरित्या रद्द झाले आहे.२०२२मध्ये बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या संदिग्धतेमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. तेथे प्रशासकांमार्फतच कामकाज सुरू आहे. पण, तेथे आता २०२०च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत.जिल्हा परिषदेची मुदत २० मार्च २०२२ रोजी, तर पंचायत समित्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. ओबीसी आरक्षण, मतदारसंघांची पुनर्रचना आदी कारणांनी निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नव्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकार आग्रही होते. मंत्रिमंडळात तसा निर्णय झाला. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

आटपाडीत घटला, खानापुरात वाढलामहाविकास आघाडी सरकारनेही जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना करत मतदारसंघ वाढविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ६८ मतदारसंघ आणि पंचायत समित्यांचे १३६ गण झाले होते. कडेगाव आणि कवठेमहांकाळवगळता उर्वरित आठ तालुक्यांत जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढला होता. पण, हा सर्व खटाटोप आता रद्दबातल झाला आहे.जुन्या गट आणि गणांनुसारच निवडणुका होणार आहेत. म्हणजे या निवडणुकीत ६० गट आणि १२० गण असतील. आटपाडी नगरपंचायत झाल्याने तो गट रद्द होणार आहे. या तालुक्यात ३ गट राहतील. खानापूर तालुक्यात एक गट वाढून ४ मतदारसंघ होतील. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या ६८ गटांच्या हिशेबाने आरक्षण सोडती काढण्यात आल्या होत्या. त्या आता रद्द होणार असून, जुन्या ६० गटांनुसार नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे.

उमेदवारांनी सोडला सुटकेचा निश्वासमतदारसंघ आणि आरक्षण निश्चित नसल्याने इच्छुक उमेदवारांत संभ्रमावस्था होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही सर्व संभ्रमावस्था संपवली आहे. जुनेच मतदारसंघ आणि आरक्षण कायम राहणार असल्याने उमेदवारांना आता आपले मतदारसंघ निवडता येतील. प्रचाराची दिशा निश्चित करून यंत्रणा कार्यान्वित करता येईल.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका २०११च्या जनगणनेनुसार होतील. त्यामुळे गट आणि गणांची पुनर्रचना करावी लागेल. याबाबत शासनस्तरावर प्रक्रिया राबवावी लागणार आहे. - ॲड. बाबासाहेब मुळीक

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024