शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Sangli: सांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

By शरद जाधव | Updated: August 19, 2023 00:39 IST

Sangli: वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.

- शरद जाधव  सांगली - वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात होणारे जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय होत असलेल्या बैलगाडी शर्यतींवरही बंदी असेल. लम्पीची लाट असल्याने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, वर्षभरानंतर जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यातच लम्पीचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत १६२९ बाधित जनावरे आढळली आहेत. यातील ७२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०१६ जनावरांना लम्पीची बाधा झाल्याने याची लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

लम्पीची लागण जनावरांमध्ये वाढू नये यासाठी आता जनावरांचे आठवडी बाजार यापुढे भरविण्यात येणार नाहीत. अनेकठिकाणी सध्या प्रशासनाची परवानगी घेऊन बैलगाडी शर्यतीही आयोजित करण्यात येत आहेत. यापुढे शर्यतींना बंदी असणार आहे. जनावरांची एका भागातून दुसऱ्या भागात वाहतूक करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

लम्पीची लागण जनावरांमध्ये वाढू नये म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार लसीकरणासह पशूपालकांचे प्रबोधनही करण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन लाख २४ हजार ७५६ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात १०० टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकरा दिवसात २७ जनावरांचा मृत्यूवर्षभर लम्पीबाधित जनावरे आढळत असलीतरी त्याचे प्रमाण कमी होते. गेल्या पंधरवड्यापासून मात्र, मोठ्या संख्येने बाधित जनावरे आढळत आहेत. यात अकरा दिवसात १०१६ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे तर यातील १३४ जनावरे बरी झाली आहेत. केवळ अकरा दिवसात २७ जनावरांचा मृत्यू झाला असून, सध्या ८५५ लम्पीबाधित जनावरे जिल्ह्यात आहेत. यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक ४८८, शिराळा २८३, पलूस २५६, मिरज २३, तासगाव १३, कवठेमहांकाळ १८ तर कडेगाव तालुक्यात ११ जनावरे बाधित आहेत.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग