शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

सांगलीचे तापमान ४२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:24 PM

सांगली : जिल्ह्यात उष्णलहरींनी ठाण मांडले असून, पारा ४२ अंशांवर गेल्याने नागरिकांना असह्य झळांचा सामना करावा लागला. किमान तापमानातही ...

सांगली : जिल्ह्यात उष्णलहरींनी ठाण मांडले असून, पारा ४२ अंशांवर गेल्याने नागरिकांना असह्य झळांचा सामना करावा लागला. किमान तापमानातही मोठी वाढ झाली असून, पारा २३ अंशावर पोहोचला आहे. येत्या दोन दिवसात पारा अंशाने कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.रविवारी दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांचे अस्तित्व जिल्हाभर जाणवत होते. शहरासह जिल्ह्याच्या प्रमुख मार्गावर दुपारी अघोषित संचारबंदीसारखे चित्र दिसत होते. छत्री, टोपी यांचा वापर करून नागरिकांना दुपारी घराबाहेर पडावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा आलेख वाढतच आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कमी तापमान राहिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र दुसऱ्या पंधरवड्यात पुन्हा तीव्र उन्हाने छळण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या सहा दिवसांत तापमानात अंशाने घट होणार असून, जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.दुसरीकडे किमान तापमानात झालेली वाढ कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. आगामी आठवडाभर जिल्ह्यातील सरासरी किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या घरात राहणार आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा असह्य ठरण्याची चिन्हे आहेत.लहरींचे अस्तित्व : दोन दिवसांचेहवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार उष्णलहरींचा सामना रविवारी मराठवाडा व मध्य महाराष्टÑातील काही जिल्ह्यांना बसला आहे. सोमवारीही काही प्रमाणात उष्णलहरींचा सामना या जिल्ह्यांना करावा लागण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आता सतर्कता बाळगावी लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी आठवडाभर जिल्ह्याच्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे उकाड्यास सामोरे जावे लागणार आहे. सरासरी तापमानापेक्षा ५ अंशाने सध्या तापमान जास्त आहे, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अंशाने जास्त आहे.