शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगली :  वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:22 IST

साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.

ठळक मुद्देवनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडेबोरगाव येथे कार्यक्रम; भाजपवर टीका

बोरगाव : राजकारणातील वनवासाची चाहूल लागताच भाजप अन् शिवसेनेकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो. देवाच्या नावाने राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा डाव अनेक वर्षांपासून खेळला जात आहे.

साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.बोरगाव (ता. वाळवा) येथे अशोकराव पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.मुंडे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून खेळवायचे चालले आहे.ते म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्यांनी स्वत: कर्ज काढून कुटुंबाला वाचविले, त्यांनी दुसऱ्याला कर्ज देणाऱ्या सहकारी संस्था उभारल्या. यालाच शून्यातून जग निर्माण करणे म्हणतात.आमदार जयंत पाटील म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य तरूणांना व सहकाराला प्रेरणादायी आहे. भाजप केवळ वल्गना करणारे सरकार ठरले आहे. पुढील निवडणुकीनंतर त्यांची सत्ता राहणार नाही, म्हणून राम मंदिराची पुडी सोडली जात आहे. आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्रित करून लढा देणार आहोत. खासदार राजू शेट्टी महिनाअखेरपर्यंत राष्ट्रवादीसोबत येतील.उदयसिंह पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धैर्यशील पाटील यांनी आभार मानले. यावेळी दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, अरूण लाड, पी. आर. पाटील, विनायक पाटील, नेताजी पाटील, शहाजी पाटील, रूपाली सपाटे, संग्राम पाटील, देवराज पाटील, सचिन हुलवान, माणिक शा. पाटील, कार्तिक पाटील, देवराज देशमुख, उदयसिंह शिंदे, डॉ. शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, अविनाश पाटील, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.तुम्ही ऊस पिकवा, आम्ही तोडतो...मुंडे यांना जयंत पाटील म्हणाले की, कृष्णा काठाने अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला दिले. त्यात बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजारामबापू, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा समावेश आहे. यावर मुंडे म्हणाले, गोदावरीचे आणि कृष्णेचे अतूट नाते आहे. तसेच साहेब तुमचे आणि आमचेही आहे. तुम्ही ऊस पिकवायचा आणि तो आम्ही तोडायचा, असे म्हणताच एकच हशा पिकला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSangliसांगली