शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सांगली :  वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:22 IST

साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.

ठळक मुद्देवनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडेबोरगाव येथे कार्यक्रम; भाजपवर टीका

बोरगाव : राजकारणातील वनवासाची चाहूल लागताच भाजप अन् शिवसेनेकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो. देवाच्या नावाने राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा डाव अनेक वर्षांपासून खेळला जात आहे.

साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.बोरगाव (ता. वाळवा) येथे अशोकराव पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.मुंडे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून खेळवायचे चालले आहे.ते म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्यांनी स्वत: कर्ज काढून कुटुंबाला वाचविले, त्यांनी दुसऱ्याला कर्ज देणाऱ्या सहकारी संस्था उभारल्या. यालाच शून्यातून जग निर्माण करणे म्हणतात.आमदार जयंत पाटील म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य तरूणांना व सहकाराला प्रेरणादायी आहे. भाजप केवळ वल्गना करणारे सरकार ठरले आहे. पुढील निवडणुकीनंतर त्यांची सत्ता राहणार नाही, म्हणून राम मंदिराची पुडी सोडली जात आहे. आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्रित करून लढा देणार आहोत. खासदार राजू शेट्टी महिनाअखेरपर्यंत राष्ट्रवादीसोबत येतील.उदयसिंह पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धैर्यशील पाटील यांनी आभार मानले. यावेळी दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, अरूण लाड, पी. आर. पाटील, विनायक पाटील, नेताजी पाटील, शहाजी पाटील, रूपाली सपाटे, संग्राम पाटील, देवराज पाटील, सचिन हुलवान, माणिक शा. पाटील, कार्तिक पाटील, देवराज देशमुख, उदयसिंह शिंदे, डॉ. शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, अविनाश पाटील, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.तुम्ही ऊस पिकवा, आम्ही तोडतो...मुंडे यांना जयंत पाटील म्हणाले की, कृष्णा काठाने अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला दिले. त्यात बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजारामबापू, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा समावेश आहे. यावर मुंडे म्हणाले, गोदावरीचे आणि कृष्णेचे अतूट नाते आहे. तसेच साहेब तुमचे आणि आमचेही आहे. तुम्ही ऊस पिकवायचा आणि तो आम्ही तोडायचा, असे म्हणताच एकच हशा पिकला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSangliसांगली