शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : राज्यात पैलवानांप्रती उदासिनता, गौतम पवार : आठ वर्षांपासून मानधनचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 11:32 IST

राज्यातील पैलवानांप्रती शासनस्तरावर प्रचंड उदासिनता दिसून येते. जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या मल्लांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरी त्यांना मदत मिळत नाही. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे, अशी व्यथा मंगळवारी नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

ठळक मुद्देहिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही वर्षांपासून बंद नगरसेवक गौतम पवार यांनी मांडली व्यथा कुस्तीक्षेत्रात दबदबा असलेल्या महाराष्ट्रात नवे मल्ल तयार होताना अडचणी

सांगली : राज्यातील पैलवानांप्रती शासनस्तरावर प्रचंड उदासिनता दिसून येते. जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या मल्लांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरी त्यांना मदत मिळत नाही. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे, अशी व्यथा नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.पवार म्हणाले की, हरीयाणा, पंजाबसारख्या राज्यांमध्ये पैलवानांना शासनाची मदत मिळते. महाराष्ट्रात मात्र आहे तेसुद्धा मानधन मिळत नाही. त्यामुळे कुस्तीक्षेत्रात दबदबा असलेल्या महाराष्ट्रात नवे मल्ल तयार होताना अडचणी येत आहेत.

सांगली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अपघातात सहा मल्ल जागीच ठार झाले. त्यांची कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. तरीही शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे आम्ही आता शासनाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेवेळी मदतपेटी ठेवून संबंधित मल्लांच्या कुटुंबियांसाठी मदत संकलन करणार आहोत. जास्तीत जास्त मदत त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू.एक पैलवान घडताना संबंधित कुटुंबांची काय कसरत होत असते, याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळे कोणत्याही पैलवानाचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो अधू झाला तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येते. कुस्तीक्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी शासनाची कोणतीही योजना नाही.

हिंदकेसरी विजेत्यासाठी १0 हजार आणि महाराष्ट्र केसरी विजेत्यास ५ हजार रुपये मानधन देण्याची शासनाची योजना असली तरी गेल्या आठ वर्षांपासून हे मानधनसुद्धा बंद आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांना जीप देण्याचाही निर्णय झाला होता. त्याचीही अंमलबजावणी नाही. त्यामुळे शासनामार्फत कुस्तीक्षेत्रासाठी भरीव अशी मदत करायला हवी, असे ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSportsक्रीडा