शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

सांगली : एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ ला कोल्हापुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:19 IST

एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारीरोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा आठ दिवसात दराचा प्रश्न न सुटल्यास चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडविण्याचा इशारा

सांगली : एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले. आठ दिवसात दराचा प्रश्न न सुटल्यास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला.येथील शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्यातील मोचार्बाबत संघटनेची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे उपस्थित होते. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात कर्नाटकात गाळपासाठी गेला.ऊस कमी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने एफआरपी अधिक १०० रुपये आणि दोन महिन्यांनतर १०० रुपये देण्यावर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात एकमत झाले. परंतु काही कारखान्यांनी एफआरपी अधिक २०० एकदम देण्याचे जाहीर करुन टाकले. जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसाची बिलेही जमा करायला सुरुवात करण्यात आली होती.हंगामापासूनच साखरेच्या दरात घट झाली. साखरेचा भाव प्रतिक्विंटलवर २८०० रुपयांवर येऊन पोहोचला. एफआरपी देता देता कारखान्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल उपलब्ध होत नसल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला.

त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. त्याविरोधात कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. साखरेचे दर पडले असले तरी उपपदाथार्पासूनही कारखानदारांना उत्पन्न मिळते. त्यातील पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत.साखरेच्या दरात तेजी होती, तेव्हा तर जादा दर दिला होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मागील आठवड्यात साखरेचा दरात अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे कारखानदारांनी हंगाम सुरू होताना जो दर जाहीर केला आहे तो ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना पैसे न देण्याबाबत आघाडी केली आहे.

कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरात एक रुपयाही कमी घेणार नाही. सरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी कोल्हापुरात मोर्चा काढला जाणार आहे. आठ दिवसात दराचा प्रश्न मिटल्यास हंगामापूर्वी प्रश्न सोडविणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडवण्यात येईल, असा इशारा प्रवक्ते खराडे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर