शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ ला कोल्हापुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:19 IST

एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारीरोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा आठ दिवसात दराचा प्रश्न न सुटल्यास चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडविण्याचा इशारा

सांगली : एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले. आठ दिवसात दराचा प्रश्न न सुटल्यास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला.येथील शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्यातील मोचार्बाबत संघटनेची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे उपस्थित होते. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात कर्नाटकात गाळपासाठी गेला.ऊस कमी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने एफआरपी अधिक १०० रुपये आणि दोन महिन्यांनतर १०० रुपये देण्यावर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात एकमत झाले. परंतु काही कारखान्यांनी एफआरपी अधिक २०० एकदम देण्याचे जाहीर करुन टाकले. जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसाची बिलेही जमा करायला सुरुवात करण्यात आली होती.हंगामापासूनच साखरेच्या दरात घट झाली. साखरेचा भाव प्रतिक्विंटलवर २८०० रुपयांवर येऊन पोहोचला. एफआरपी देता देता कारखान्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल उपलब्ध होत नसल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला.

त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. त्याविरोधात कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. साखरेचे दर पडले असले तरी उपपदाथार्पासूनही कारखानदारांना उत्पन्न मिळते. त्यातील पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत.साखरेच्या दरात तेजी होती, तेव्हा तर जादा दर दिला होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मागील आठवड्यात साखरेचा दरात अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे कारखानदारांनी हंगाम सुरू होताना जो दर जाहीर केला आहे तो ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना पैसे न देण्याबाबत आघाडी केली आहे.

कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरात एक रुपयाही कमी घेणार नाही. सरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी कोल्हापुरात मोर्चा काढला जाणार आहे. आठ दिवसात दराचा प्रश्न मिटल्यास हंगामापूर्वी प्रश्न सोडविणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडवण्यात येईल, असा इशारा प्रवक्ते खराडे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर