शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठीचा तांदूळ संपला, सांगली जिल्ह्यातील स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:39 IST

तांदळाचा पुरवठाच हाेत नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार संद्या बंद

सांगली : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील २ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी दर दोन महिन्याला १२०० टन तांदूळ लागतो. पण, सध्या जिल्ह्यातील २५०० शाळांमधील १०० टक्के तांदूळ संपला असून अजूनही पुरवठा विभागाकडून मिळालेला नाही. त्यामुळे सध्या पोषण आहारात खंड पडेल, अशी स्थिती जिल्ह्यातील शाळांमध्ये निर्माण झाली आहे.पहिली ते आठवीच्या २५०० अनुदानित शाळांमधील २ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जाताे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांमधील तांदूळ संपल्यामुळे मुलांचे हाल होत असल्याने तातडीने मिळावा, अशी विनंती केली होती. अनेकवेळा शासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार ही केला.

परंतु, तांदळाचा पुरवठाच हाेत नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार संद्या बंद आहे. काही शाळांनी उधारी करुन आठवडाभर पोषण आहार चालू ठेवला होता. पण, गेल्या पंधरा दिवसापासून तांदूळ संपूनही प्रशासनाकडून त्याचा पुरवठा झाला नाही, असे जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांचे मत आहे.तांदळाची टंचाईशालेय पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ दोन महिन्यातून एकदा उचलला जातो. जिल्ह्यातील २५०० शाळांना दोन महिन्यासाठी १२०० टन तांदळाची गरज आहे. गेल्या महिन्याभरापासून शाळांमधील तांदूळ संपला असून काही शाळांमध्ये शिल्लक असलेल्या तांदळावर कस तर पंधरादिवस पोषण आहार चालू होता. सध्या पूर्णच तांदूळ संपला असून तातडीने १२०० टन तांदळाची गरज आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी