शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

...तर सांगली जिल्हा बँकेची कृषी कर्ज थकबाकी तीन हजार कोटींवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:58 IST

बँक प्रशासनाचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष : पीक कर्जाची थकबाकी भरणा पूर्णपणे ठप्प

सांगली : शासनाने मार्च २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सध्या पीक कर्जाची थकबाकी भरणा पूर्णपणे थांबली आहे. बँकेची जून २०२५ अखेरची शेती कर्जाची सुमारे ७२९ कोटी इतकी थकबाकी आहे. जर शासनाने कर्जमाफी दिली नाही, तर जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे तीन हजार कोटींवर जाणार असून, बँकेचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडणार आहे.माजी आमदार बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या आंदोलनानंतर शासनाने शेती कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यासाठी एक उच्च समिती नियुक्त केली असून, ही समिती एप्रिलमध्ये शासनाला अहवाल देणार आहे. या अहवालानंतर शासन ३० जूनअखेर कर्जमाफी देणार आहे. या आश्वासनावर कर्जमाफीचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, कर्जमाफी किती, कोणाला, कोणते निकष, सरसकट देणार की यामध्ये पुन्हा मागील प्रमाणे, नियमित भरणाऱ्यांना काय दिले जाईल, हे काहीही स्पष्ट झाले नसल्याने कर्जमाफीबाबत सध्यातरी संभ्रम निर्माण झाला आहे. असे असले तरी शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांनी कर्जे भरणे थांबविले असून, शेती कर्जाची वसुली पूर्णपणे थांबली आहे. शासनाच्या घोषणेचा सर्वाधिक फटका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बसणार आहे. जिल्हा बँकेने मार्च २०२५ अखेर सुमारे २४०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेती कर्जाचा एक रुपया वसूल होणार नसल्यामुळे बँकेला आर्थिक फटका बसणार आहे. सध्या मार्च २०२५ अखेरची सुमारे ५५७ कोटी इतकी जुनी थकबाकी असून, यामध्ये जूनअखेर वाढ होऊन ती ७२९ कोटी ५१ लाख इतकी झाली आहे. ३० जून २०२६ अखेरपर्यंत शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी दिली नाहीतर मात्र थकीत ७२९ कोटी आणि चालू २४०० कोटी अशी सुमारे जिल्हा बँकेची थकबाकी तीन हजार कोटींवर जाईल. असे झाल्यास जिल्हा बँकेचे आर्थिक गणितच बिघडणार आहे.

जून २०२५ अखेरची जुनी थकबाकी : ७२९ कोटीजिल्हा बँकेने दिलेल्या शेतीकर्जापैकी मार्च २०२५ अखेर सुमारे ५५७ कोटी ९२ लाख इतकी थकबाकी असून, ५१,२६४ सभासदांचा समावेश आहे. थकबाकीत सर्वाधिक थकबाकी जत तालुक्याची असून, १४३ कोटी इतकी थकबाकी आहे. तासगावमध्ये १०४ कोटी, बाळबा ३१ कोटी ७० लाख, शिराळा ९ कोटी १८ लाख, मिरज ९९ कोटी ८२ लाख, खानापूर २२ कोटी १९ लाख, आटपाडी ३२ कोटी ३४ लाख, पलूस ३८ कोटी १० लाख, कडेगाव १४ कोटी ६५ लाख, कवठेमहकाळ ६६ कोटी इतकी थकबाकी आहे, तर ३० जूनअखेर थकबाकीत वाढ झाली असून, ती ७२९ कोटी ५१ लाख इतकी झाली आहे.

३० जून २०२५ अखेरची तालुकानिहाय थकबाकी

  • तासगाव : १६९ कोटी ७८ लाख
  • जत : १६२ कोटी ६२ लाख
  • मिरज : ११८ कोटी ३७ लाख
  • कवठेमहकाळ : ७० कोटी ९३ लाख
  • पलूस : ५४ कोटी ७० लाख
  • नवलवा : ४९ कोटी ९ लाख
  • आटपाडी : ३६ कोटी ६६ लाख
  • कडेगाव : २६ कोटी ८५ लाख
  • खानापूर : २५ कोटी ८२ लाख
  • शिराळा : १४ कोटी ७२ लाख
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Bank's agricultural loan arrears to reach ₹3,000 crore.

Web Summary : Sangli District Bank faces ₹3,000 crore in agricultural loan arrears if the government doesn't waive loans. Farmers stopped repayments after the loan waiver announcement, impacting the bank's financial stability. The bank distributed ₹2,400 crore in crop loans. Existing arrears are ₹729 crore.