शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

...तर सांगली जिल्हा बँकेची कृषी कर्ज थकबाकी तीन हजार कोटींवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:58 IST

बँक प्रशासनाचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष : पीक कर्जाची थकबाकी भरणा पूर्णपणे ठप्प

सांगली : शासनाने मार्च २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सध्या पीक कर्जाची थकबाकी भरणा पूर्णपणे थांबली आहे. बँकेची जून २०२५ अखेरची शेती कर्जाची सुमारे ७२९ कोटी इतकी थकबाकी आहे. जर शासनाने कर्जमाफी दिली नाही, तर जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे तीन हजार कोटींवर जाणार असून, बँकेचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडणार आहे.माजी आमदार बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या आंदोलनानंतर शासनाने शेती कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यासाठी एक उच्च समिती नियुक्त केली असून, ही समिती एप्रिलमध्ये शासनाला अहवाल देणार आहे. या अहवालानंतर शासन ३० जूनअखेर कर्जमाफी देणार आहे. या आश्वासनावर कर्जमाफीचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, कर्जमाफी किती, कोणाला, कोणते निकष, सरसकट देणार की यामध्ये पुन्हा मागील प्रमाणे, नियमित भरणाऱ्यांना काय दिले जाईल, हे काहीही स्पष्ट झाले नसल्याने कर्जमाफीबाबत सध्यातरी संभ्रम निर्माण झाला आहे. असे असले तरी शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांनी कर्जे भरणे थांबविले असून, शेती कर्जाची वसुली पूर्णपणे थांबली आहे. शासनाच्या घोषणेचा सर्वाधिक फटका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बसणार आहे. जिल्हा बँकेने मार्च २०२५ अखेर सुमारे २४०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेती कर्जाचा एक रुपया वसूल होणार नसल्यामुळे बँकेला आर्थिक फटका बसणार आहे. सध्या मार्च २०२५ अखेरची सुमारे ५५७ कोटी इतकी जुनी थकबाकी असून, यामध्ये जूनअखेर वाढ होऊन ती ७२९ कोटी ५१ लाख इतकी झाली आहे. ३० जून २०२६ अखेरपर्यंत शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी दिली नाहीतर मात्र थकीत ७२९ कोटी आणि चालू २४०० कोटी अशी सुमारे जिल्हा बँकेची थकबाकी तीन हजार कोटींवर जाईल. असे झाल्यास जिल्हा बँकेचे आर्थिक गणितच बिघडणार आहे.

जून २०२५ अखेरची जुनी थकबाकी : ७२९ कोटीजिल्हा बँकेने दिलेल्या शेतीकर्जापैकी मार्च २०२५ अखेर सुमारे ५५७ कोटी ९२ लाख इतकी थकबाकी असून, ५१,२६४ सभासदांचा समावेश आहे. थकबाकीत सर्वाधिक थकबाकी जत तालुक्याची असून, १४३ कोटी इतकी थकबाकी आहे. तासगावमध्ये १०४ कोटी, बाळबा ३१ कोटी ७० लाख, शिराळा ९ कोटी १८ लाख, मिरज ९९ कोटी ८२ लाख, खानापूर २२ कोटी १९ लाख, आटपाडी ३२ कोटी ३४ लाख, पलूस ३८ कोटी १० लाख, कडेगाव १४ कोटी ६५ लाख, कवठेमहकाळ ६६ कोटी इतकी थकबाकी आहे, तर ३० जूनअखेर थकबाकीत वाढ झाली असून, ती ७२९ कोटी ५१ लाख इतकी झाली आहे.

३० जून २०२५ अखेरची तालुकानिहाय थकबाकी

  • तासगाव : १६९ कोटी ७८ लाख
  • जत : १६२ कोटी ६२ लाख
  • मिरज : ११८ कोटी ३७ लाख
  • कवठेमहकाळ : ७० कोटी ९३ लाख
  • पलूस : ५४ कोटी ७० लाख
  • नवलवा : ४९ कोटी ९ लाख
  • आटपाडी : ३६ कोटी ६६ लाख
  • कडेगाव : २६ कोटी ८५ लाख
  • खानापूर : २५ कोटी ८२ लाख
  • शिराळा : १४ कोटी ७२ लाख
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Bank's agricultural loan arrears to reach ₹3,000 crore.

Web Summary : Sangli District Bank faces ₹3,000 crore in agricultural loan arrears if the government doesn't waive loans. Farmers stopped repayments after the loan waiver announcement, impacting the bank's financial stability. The bank distributed ₹2,400 crore in crop loans. Existing arrears are ₹729 crore.