शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली - अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:50 IST

'मित्रपक्षाशी आघाडी करून फसलो'

सांगली : सर्वांना सामावून घेणारा, चांगल्या विचारधारेने चालणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांनी विकसित केलेली सांगलीकाँग्रेसकडेच चांगली राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.संजयनगर येथे गुरुवारी काँग्रेस मेळावा तसेच आरोग्यवर्धिणी केंद्राचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर जामदार, कांचन कांबळे, उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक मनोज सरगर, संतोष पाटील, रोहिणी पाटील, युवा नेते जितेश कदम, आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची जोडी आगामी निवडणुकीत झपाटून काम करेल. ती बिनतोड ठरेल. देशाचे वातावरण बदलत आहे. कर्नाटकात लोकांनी भाजपला हादरा दिला. तिथे आता स्थिर आणि गतिमान सरकार आले. महाराष्ट्रात मात्र स्पष्ट बहुमत असताना फोडाफोडी केली जात आहे. लोकशाहीचा गळा घोटला जातोय. आमचं राजकारण असं नाही. आम्ही भाजपच्या तोंडाला फेस आणू. सांगलीत विश्वजित, विशाल, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांच्या भक्कम एकजुटीला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मित्रपक्षाशी आघाडी करून फसलोविश्वजित कदम म्हणाले, महापालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने नाईलाज म्हणून मित्रपक्षाशी आघाडी केली, मात्र आम्ही फसलो. त्याची किंमत मोजावी लागली. संजयनगरने मात्र स्पष्ट साथ दिली.आम्ही ७५ नगरसेवक निवडून आणूविशाल पाटील म्हणाले, जिल्ह्यातील काँग्रेस आता थांबणार नाही. राष्ट्रवादीचा उर्वरित गट फुटला तरी आम्ही ७५ नगरसेवक निवडून आणू, एवढी ताकद इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांत आहे. जाती-धर्मात भांडण लावून जिंकणे एवढाच भाजपचा कार्यक्रम आहे.

‘हात’ असता तर चित्र वेगळे असतेविशाल पाटील म्हणाले, दहा वर्षे खासदार राहिलेल्या नेत्याने या भागासाठी एक रुपयाचा निधी दिला नाही. त्याचे परिणाम म्हणून आता त्यांच्या हाताला पुन्हा लोकसभा लागणार नाही. गेल्या निवडणुकीत हात चिन्ह असते तर वेगळे चित्र असते, यावेळी ते दिसेल.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण