शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
5
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
6
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
7
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
8
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
9
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
10
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
11
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
12
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
13
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
15
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
16
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
18
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
19
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत, जतमधील डॉक्टरला दंड; सांगलीतील ग्राहक तक्रार निवारण मंचाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:34 IST

‘व्हायरल इन्फेक्शन’ गृहीत धरून उपचार केले

सांगली : रुग्णावर औषधोपचारात हयगय करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जत येथील डॉक्टर डॉ. विद्याधर पाटील यांना ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दंड ठोठावला. त्यांच्याविरोधात शीतल सागर साळे या महिलेने ॲड. शैलेंद्र केळकर यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दिली होती.शीतल साळे यांची चार वर्षांची मुलगी अवंतिका हिला जतमधील डॉ. विद्याधर पाटील यांच्या बालगोपाल लहान मुलांच्या रुग्णालयात २५ जुलै २०१८ रोजी ताप आल्याने दाखल केले होते. तिच्या रक्ताच्या डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, हिमोग्लोबीन, वायडल, आदी चाचण्या केल्या. अवंतिकाच्या प्लेटलेट्स एक लाख ५८ हजार इतक्या असल्याचे दिसून आले.दोन दिवसानंतरही अवंतिकाचा ताप कमी झाला नसल्याने डॉक्टरांनी तिच्या चाचण्या पुन्हा करून घेतल्या. त्यावेळी प्लेटलेट्स ८० हजारांपर्यंत खालावल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी प्लेटलेट्स कमी झाल्याचे कारण शोधण्यासाठी कोणतीही चाचणी न करताच ‘व्हायरल इन्फेक्शन’ गृहीत धरून उपचार केले.

२७ जुलैच्या रात्री अवंतिकाचे पाय गार पडत असल्याचे लक्षात आल्यावर साळे यांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉ. पाटील यांनी अवंतिकावर योग्य उपचार सुरू असून, काळजी करू नका असे सांगितले. २८ रोजी हृदयाचे ठोके तपासले असता ते ५० असल्याचे त्यांनी सांगितले. तिला कार्डियाक मसाज देत सांगलीला जाण्यास सांगितले. सांगलीला नेताना डॉक्टरांनी जीव वाचविणारे कोणतेही उपचार दिले नाहीत. तिची प्रकृती आणखी बिघडल्याने कवठेमहांकाळमध्ये किलबिल रुग्णालयात दाखविले असता डॉ. कोळेकर यांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तसा दाखलाही दिला.साळे यांनी डॉ. विद्याधर पाटील यांच्याविरोधात ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. डॉ. पाटील यांनी सर्व आरोप नाकारले. फेरतपासणीमध्ये मात्र अवंतिकाच्या चाचण्या न करताच तिच्यावर औषधोपचार केल्याचे मान्य केले. आयोगाने डॉ. पाटील यांच्याबाबतची तक्रार शाबीत झाल्याचा निष्कर्ष काढला. साळे यांना नुकसानभरपाई म्हणून ७ लाख ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक लाख, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी २० हजार देण्याचे आदेश दिले.