शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज, अंतर्गत संघर्षाने खचले सैन्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 10:30 IST

पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सांगलीतील काँग्रेसच्या वाटचालीबद्दल प्रदेश कार्यकारिणीतही चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्जअंतर्गत संघर्षाने खचले सैन्यबळ

अविनाश कोळी  

सांगली : पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सांगलीतील काँग्रेसच्या वाटचालीबद्दल प्रदेश कार्यकारिणीतही चिंता व्यक्त होत आहे.मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगली काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव, गोंधळ व गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व आता नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नेत्यांनी मान्य केले होते. समन्वयाची तात्पुरती जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर सोपविण्यात आली आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या जिल्ह्यात भाजपने याच परिस्थितीचा फायदा घेत मुसंडी मारली आहे.खासदार तसेच सर्वाधिक चार आमदार असलेला भाजप आता ताकद विस्तारण्यात दंग आहे. दुसरीकडे भाजपला टक्कर देण्याची तयारी करण्यापेक्षा, काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले. त्यामुळे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जेवढी ताकद काँग्रेसकडे होती, त्यातील निम्मी ताकदही आता राहिलेली नाही.

सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि गटबाजीला आलेले उधाण काँग्रेसची ताकद कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. कार्यकर्त्यांच्या बाबतीत काँग्रेस अन्य पक्षांच्या तुलनेत मजबूत दिसत असला तरी, नेत्यांमधील गटबाजीमुळे त्यांचे सैन्य खचले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांना चिंता वाटत आहे.मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील यशानंतर काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि मनातही उत्साहाच्या लाटा दिसून आल्या. पण दुसरीकडे धुमसणारी गटबाजीही तितक्याच तीव्रतेने या लाटांवर स्वार होताना दिसून आली.

मदन पाटील, पतंगराव कदम यांच्या काळातही गटबाजी होती, मात्र सर्व गटांना ऐन निवडणुकीत पंखाखाली घेत ताकदीने लढत देण्याचे त्यांच्यात कसबही होते. आता तसा प्रयत्न करणारा किंवा तशी ताकद असलेला एकही नेता काँगे्रसकडे नाही. भाजपला टक्कर देताना काँग्रेसला आता स्वत:चे घर प्रथम दुरुस्त करावे लागणार आहे.ही दुरुस्ती करण्यासाठी पक्षाकडे वेळही कमी आहे. मुदतीत गटबाजी रोखण्यात यश आले नाही, तर मागील निवडणुकांपेक्षा मोठ्या संकटास पक्षाला सामना करावा लागेल.गटबाजी उजेडात, मार्ग सापडेनाआॅगस्टमध्ये काँग्रेसच्या सांगलीतील संघर्ष यात्रेत प्रदेशच्या दिग्गज नेत्यांसमोर गटबाजी दिसून आली. शहरात लावलेल्या फलकांवरही पक्षाचे नेते, पदाधिकारी गटबाजीमुळे विभागले गेले होते. यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोट ठेवले होते. त्यापूर्वीही विधानपरिषद निवडणूक, महापालिका निवडणूक यामध्येही गटबाजी दिसून आली. वरिष्ठ नेत्यांना या गोष्टी कळूनही, त्यांना मार्ग सापडत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली