शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सांगली भू-विकास बँकेच्या थकबाकीदार कर्जदारांना १0९ कोटीची सवलत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:49 PM

सांगली येथील भू-विकास बँकेच्या थकबाकीदार १ हजार ६७२ कर्जदारांसाठी सहकार विभागाने पुन्हा एकरकमी परतफेड योजना जाहीर केली असून याअंतर्गत १0९ कोटी रुपयांची माफी दिली जाणार आहे. योजना जाहीर करून, कारवाईचे इशारे देऊनही थकबाकीदारांनी बँकेला ठेंगा दाखविणे सुरूच ठेवले आहे. 

ठळक मुद्दे१ हजार ६७२ थकबाकीदार कर्जदारांसाठी पुन्हा एकरकमी परतफेड योजना २८ फेब्रुवारी २0१८ पर्यंतची ‘डेडलाईन’ सात-बारा उताऱ्यावरील बँकेचा बोजा होणार कमी

सांगली  , दि. २६ : येथील भू-विकास बँकेच्या थकबाकीदार १ हजार ६७२ कर्जदारांसाठी सहकार विभागाने पुन्हा एकरकमी परतफेड योजना जाहीर केली असून याअंतर्गत १0९ कोटी रुपयांची माफी दिली जाणार आहे. योजना जाहीर करून, कारवाईचे इशारे देऊनही थकबाकीदारांनी बँकेला ठेंगा दाखविणे सुरूच ठेवले आहे. 

सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेसाठी सहकार विभागाने एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत ३१ मार्च २0१८ ची मुदत दिली आहे. यासाठी थकबाकीदार कर्जदाराला २८ फेब्रुवारी २0१८ पर्यंतची ‘डेडलाईन’ दिली आहे. सांगली भू-विकास बँकेचे एकूण १ हजार ८६0 सभासद थकबाकीत आहेत.

हे सर्वच थकबाकीदार एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र ठरतात. त्यांची एकूण थकबाकी सध्या १३२ कोटी ५0 लाख ३५ हजार ५८१ रुपये आहे. यातील एकूण १0९ कोट ८२ लाख ४३ हजार ३४२ रुपयांची सवलत एकरकमी परतफेड योजनेतून मिळणार आहेत. म्हणजेच केवळ ३१ कोटी ८१ लाख ५८ हजार ४0 रुपयेच थकबाकीदारांना भरावे लागणार आहेत. संबंधित कर्जदारांनी ही रक्कम जमा केल्यास त्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील बँकेचा बोजा कमी होणार आहे. 

बँकेने एकीकडे सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असले तरी जे थकबाकीदार योजना जाहीर करूनही रक्कम भरणार नाहीत त्यांच्यावर सहकार अधिनियमातील कलम १३७ अन्वये कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. सांगली भू-विकास बँकेला शासनाच्या सुचनेनुसार २00७ ते २0१७ या कालावधित अनेकवेळा थकबाकीदार कर्जदारांसाठी सवलतींच्या योजना जाहीर करण्यात आल्या. या सवलींच्या फरकाची रक्कम ५0 कोटींच्या घरात गेली आहे. आता नव्या योजनेमुळेही त्यात आणखी भर पडू शकते.

फरकाची ही रक्कम कधीही शासनाने जिल्हा भू-विकास बँकेला दिलेली नाही. राज्यातील सर्व जिल्हा भू-विकास बँकांना वारंवार मागणी करूनही ही रक्कम मिळाली नाही. तरीही या बँका शासनाच्या एकरकमी सवलत योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. यंदाही नव्या आदेशाचे पालन सुरू करण्यात आले आहे.

जिल्हा भू-विकास बँकेचे प्रशासक प्रकाश आष्टेकर यांनी थकबाकीदारांना आवाहन केले आहे की, सर्वच पात्र कर्जदारांनी मुदतीत अर्ज करून सवलत वगळता अन्य थकबाकी भरावी, अन्यथा त्यांच्यावरील कारवाई अटळ आहे. एकरकमी सवलत योजनेची ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :bankबँकSangliसांगली