शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली पुन्हा पुराच्या छायेखाली, कर्नाळ रोड पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:30 IST

rain, sanglinews, krushnariver मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवारी सायंकाळीपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३५ फुटापर्यंत गेली होती. त्यामुळे कर्नाळ रोड पाण्याखाली गेला असून जामवाडीतील सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे सांगली शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसांगली पुन्हा पुराच्या छायेखाली, कर्नाळ रोड पाण्याखालीजामवाडी, सुर्यवंशी प्लॉट, अमरधाममध्ये पाणी शिरले

सांगली : मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवारी सायंकाळीपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३५ फुटापर्यंत गेली होती. त्यामुळे कर्नाळ रोड पाण्याखाली गेला असून जामवाडीतील सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे सांगली शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.मुसळधार पावसामुळे कोयना व वारणा धरणातून पाण्याची विसर्ग सुरू केला आहे. गुरूवारी पहाटे ३४ हजार २११ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळी ३५ फुटापर्यंत गेली आहे. नदीचे पाणी सुर्यवंशी प्लॉट परिसरात शिरले आहे. कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अमरधाम स्मशानभूमीतही पुराचे पाणी शिरले होते. मुसळधार पाऊस व धरणातून सुरू मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. पाणी पातळी ३८ ते ४० फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीला पुराचा धोका निर्माण झाला आहे.६४१ लोकांचे स्थलांतरपुरग्रस्त भागासह मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. सायंकाळपर्यंत १२८ कुटूंबातील ६४१ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यापैकी २४१ नागरिकांची महापालिकेने तात्पुरत्या निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसSangliसांगलीriverनदी