शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला , स्वच्छता मुंबईमुळे फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 7:30 PM

मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले.

ठळक मुद्देअखेर सांगलीच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देऊन मुंबई महापालिकेचे पथक परतले.

सांगली : महापूर ओसरल्यानंतर सांगलीच्या स्वच्छतेत मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांसह अधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. तब्बल आठवडाभर ४५० कर्मचाऱ्यांचे पथक अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह स्वच्छतेच्या कामात सहभागी झाले होते. मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले.

महापुरानंतर खºयाअर्थाने स्वच्छतेचे मोठे आव्हान सांगली महापालिकेसमोर होते. अशा संकटसमयी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह राज्यातील नगरपालिका सांगलीकरांच्या मदतीला धावून आल्या. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सफाई कामगार व अधिकाºयांचे पथक सांगलीला पाठविले. या पथकाचे नेतृत्व कार्यकारी अभियंता सुनील सरदार व स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई महापालिकेचे ४०० कर्मचारी व ५० वाहनचालक, १२ डंपर, ७ सक्शन व जेटिंग व्हॅन, २ जेसीबी, ३ स्मॉल अर्थमुव्हर यंत्रे असा सर्व ताफा मुंबईतून १२ आॅगस्ट रोजी रात्रीतच सांगलीमध्ये दाखल झाला.

सांगलीचे आयुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी या पथकाचे स्वागत करून पूरबाधित क्षेत्राची माहिती दिली. १३ आॅगस्ट रोजी मुंबईच्या अधिकाºयांनी पूरबाधित क्षेत्राची पाहणी करून प्राथमिक आराखडा तयार केला. त्यानुसार ५० कर्मचाºयांची सात पथके तयार करून एकाच वेळी सात ठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. या पथकाने पहिल्या दिवशी २०० टन कचरा उचलला. सात सक्शन व्हॅनच्या मदतीने शहरामध्ये साचलेले पाणी, तुंबलेली ड्रेनेज व सेप्टीक टँक, मलनि:सारण वाहिन्या स्वच्छ करुन ७०० ते ७५० टन मैलायुक्त पाणी कचरा डेपोकडे रवाना केले.पाणी ओसरल्या भागात चिखल व कचरा रस्त्यावर पडला होता. हा परिसर स्वच्छ करणे आव्हानात्मक बाब होती. पण ४५० कर्मचाºयांच्या मदतीने हे आव्हानही त्यांनी लिलया पेलले. १५ आॅगस्ट रोजी साधारणत: ७० टक्के परिसर स्वच्छ झाला होता. १६ रोजी पूरग्रस्त नागरिक व व्यावसायिक घरी, दुकानांकडे परतू लागले. परिणामी घरातील व दुकानातील साहित्य, फर्निचर, कपडे, पुस्तके, सडलेले खाद्यपदार्थ आदीमुळे शहरामध्ये कच-याचे ढीग व दुर्गंधी पसरली होती. ही परिस्थिती पाहून मुंबईच्या पथकाचा मुक्काम आणखी दोन ते तीन दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला.

दि. १७ ते १९ आॅगस्टदरम्यान शहरातील बाजारपेठा, रहिवासी विभाग व बफरझोनमध्ये स्वच्छता केली. या पथकाने जवळपास साडेतीन हजार टन कचरा उचलून तो डेपोवर पोहोचविला होता. या कर्मचा-यांच्या राहण्याची, भोजन व नाष्ट्याची जबाबदारी शाखा अभियंता वैभव वाघमारे व त्यांच्या सहका-यांनी पार पाडली. अखेर सांगलीच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देऊन मुंबई महापालिकेचे पथक परतले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरMumbaiमुंबईMuncipal Corporationनगर पालिका