शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:55 IST

या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते.

सांगली : भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या विलिनीकरणासाठी आंदोलन करुन जनतेला वेठीस धरले. त्यावेळी तुम्ही विरोधक होतात, आता तर तुमची सत्ता आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत एसटीचे विलिनीकरण झाले पाहिजे, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली.धनाजी गुरव म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बदलून भाजप आणि आर. एस. एस.चे सरकार आले आहे. या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सदाभाऊ खोत आणि गाेपीचंद पडळकरांचा मोठा पुढाकार होता. या दोन्ही नेत्यांना भाजपने मंत्री करण्याची गरज आहे. कारण, ते तत्काळ एसटीचे राज्य शासनाने विलिनीकरण करणार आहेत.या सरकारमधील नेत्यांना एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणूनच दि. १५ जुलै रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. एक महिन्यात खोत आणि पडळकरांना एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण जमले नाही तर त्यांनी एसटी कर्मचारी आणि जनतेची माफी मागितली पाहिजे. अन्यथा या प्रश्नावर राज्यातील जनताच रस्त्यावर येईल, असा इशाराही गुरव यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSadabhau Khotसदाभाउ खोत