शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी ५००० कोटींची गरज, आराखडा करण्याच्या जलसंपदामंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:29 IST

जयंत पाटील भाजप प्रवेशाची माहिती नाही

सांगली : जिल्ह्यातील अपूर्ण टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ आणि वाकुर्डे सिंचन योजनांसाठी पाच हजार कोटी रुपये निधीची गरज आहे. या योजनांच्या अपूर्ण कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल तातडीने देण्याची सूचना दिली आहे. या अहवालानंतर निधी मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.सांगलीतील वारणालीत बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री विखे-पाटील बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदी उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ, ताकारी, आरफळ, वारणा आणि मोरणा योजनांची अनेक कामे प्रलंबित आहेत. या योजनांसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अपूर्ण योजना २०२८ पर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज असला तरी निधी उपलब्ध करून देऊन त्या २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पुढील वर्षापासून पुराचे ५५ टीएमसी पाणी वळविणारपूरनियंत्रणासाठी वर्ल्ड बँकेने तीन हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पुराचे पाणी वळवण्याच्या योजनेच्या कामांची निविदा लवकरच काढली जाणार आहे. पुराचे पाणी एका वर्षात नेण्याचा प्रयत्न आहे. पुढील वर्षापासून ५५ टीएमसी पाणी वळविले जाईल, त्यामुळे पुरापासून मुक्तता होईल, असा विश्वास मंत्री विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

महापालिकेने प्रदूषण थांबवावे, अन्यथा पाणी कपातराज्यात नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. याबाबत महानगरपालिका, नगरपालिकांना पाणी दिले जाते. प्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिकेस एचटीपी पंप बसवावे लागतील. ज्या महापालिका कार्यवाही करणार नाहीत, त्यांची पाणी कपात करावी लागेल, असा इशारा मंत्री विखे-पाटील यांनी दिला.

जयंत पाटील भाजप प्रवेशाची माहिती नाहीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाच्या अडचणीच्या काळातही नेतृत्व केले आहे. नवनवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे राजीनामा देणार असतील. पण त्यांची भाजपमध्ये येण्यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.