शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

सांगलीतील शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात मंजूर झाले 'हे' ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:12 IST

'शिक्षण संस्थांकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. समाज विरोधात बोलत असेल, तर संस्थांनी आत्मचिंतन करावे'

सांगली : शिक्षण संस्थांकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. समाज विरोधात बोलत असेल, तर संस्थांनी आत्मचिंतन करावे, असे प्रतिपादन शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सांगलीत रविवारी महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे होते.सुळे म्हणाल्या, सरकारने संस्थांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. सरकारविरोधात शिक्षण संस्था असे वातावरण बदलण्यासाठी दोन पावले पुढे येतो, सरकारनेही एक पाऊल पुढे यावे. शिक्षणावरील तरतूद वाढवावी. रिक्त पदे भरावीत. पवित्र पोर्टल बंद करावे. सगळेच संस्थाचालक वाईट नाहीत. समन्वयासाठी यंत्रणा निर्माण करू.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पवित्र पोर्टल कायम ठेवायचे असल्यास, जिल्हानिहाय करा. निर्बंध जितके अधिक, तितका गोंधळ होतो. सरकारी नोकर भरतीतही गोंधळ होतोच. त्यामुळे शिक्षण संस्थांना स्वातंत्र्य द्या. त्यांनाच काय वाटोळे करायचे ते करू द्या.माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, ७० ते ८० टक्के विद्यार्थी खासगी संस्थांत शिकतात. या संस्थांना स्वायत्तता देण्याऐवजी नियंत्रणे आणली. आवळण्याचे प्रयत्न झाले. शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी गुदमरलेल्या अवस्थेत काम करताहेत. त्यांना स्वातंत्र्य द्यावे. डॉ. कदम यांनी अधिवेशनासाठी पाच लाखांची देणगी जाहीर केली.कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संस्थांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. अधिवेशनाला खासदार फौजिया खान, आमदार जयंत आसगावकर, अरुण लाड, सुमनताई पाटील, किरण सरनाईक, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जितेश कदम, पृथ्वीराज पाटील, अमरसिंह देशमुख, विशाल पाटील, वैभव नायकवडी, भगवानराव साळुंखे, चंद्रकांत रघुवंशी, विजय गव्हाणे, अशोक थोरात, रवींद्र फडणवीस, भालचंद्र पाटील, एन.डी. बिरनाळे आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले.

महत्त्वाचे ठराव असे :

  • शिक्षण संस्थांच्या अडचणींचा विचार करून नवे शैक्षणिक धोरण राबवावे.
  • पवित्र पोर्टल रद्द करावे.
  • नव्या शाळा व महाविद्यालये अनुदानीत तत्त्वावरच मंजूर करावीत.
  • सन २०१२ नंतर संस्थांनी नेमलेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना मान्यता व वेतन द्यावे.
  • ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत.
  • शिक्षकेतर कर्मचारी भरती त्वरित सुरू करावी.
  • दरडोई उत्पन्नाच्या आठ टक्के खर्च शिक्षणासाठी करावा.
  • शाळा, महाविद्यालयांचा घरफाळा रद्द करावा.
  • जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत.
टॅग्स :SangliसांगलीEducationशिक्षण