शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

सांगली जिल्ह्यातील ६९६ गावांच्या सरपंचपदाची फेरआरक्षण सोडत, इच्छुकांचे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:39 IST

अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता

सांगली : जिल्ह्यातील ६९६ गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम मंगळवार, दि.१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. ४२० खुल्या, ८३ अनुसूचित जाती, ५ अनुसूचित जमाती, १८८ नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षण असणार आहे. यापैकी ५० टक्के म्हणजे ३४९ गावांच्या कारभारी महिला असणार आहे. या प्रक्रियेकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांचे, इच्छुकांचे लक्ष लागले आहे.उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे २०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंचपद आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे. मंगळवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तालुकास्तरावर कार्यक्रम होईल. प्रांताधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली तहसीलदार ही प्रक्रिया पार पाडतील.

अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यताजिल्ह्यात यावर्षी आणि पुढील वर्षी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडेल. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकारण जोरदार तापणार आहे. त्यामुळे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खरा रंग येणार आहे. थेट सरपंच निवड होणार असल्याने इच्छुकांचे लक्ष लागले आहे. परंतु, फेरआरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.

६९६ गावांच्या सरपंचांचे असे असणार आरक्षणतालुका / ग्रामपंचायत संख्या / अनु.जाती / अनु.जमाती / ना.मा.प्र / खुलेमिरज ६४ /९ /१ /१७ /३७तासगाव ६८ /७ /० /१८ /४३कवठेमहांकाळ ५९ /८ /० /१६ /३५जत ११६ /१४ /१ /३१ /७०खानापूर ६४ /९ /१ /१७ /३७आटपाडी ५३ /६ /० /१४ /३३कडेगाव ५४ /६ /१ /१५ /३२पलूस ३३ /४ /० /९ /२०वाळवा ९४ /११ /१ /२६ /५६शिराळा ९१ /९ /० /२५ /५७एकूण ६९६ /८३ /५ /१८८ /४२०