शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर सोहळा २२ जानेवारी नव्हे, तर 'या' दिवशी व्हायला हवा होता- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:10 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्ताबाबत आपलं वेगळं मत मांडलं आहे.

Jayant Patil On Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत असल्याचं चित्र आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावरून टोला लगावला आहे. " रामनवमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे का?" असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील यांच्या हस्ते आज इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील श्रीराम मंदिरात कलश पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना जयंत पाटील राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "अयोध्येतील राम मंदिर न्यासाने उभे केले आहे. देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे, त्यामुळे कोणा एकाची त्यावर मालकी असू शकत नाही. मंदिर उभारले जात आहे त्याला जास्त महत्व आहे," असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

दर्शनासाठी कधी जाणार?

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून वाद रंगत असताना "मी अयोध्येत दर्शनासाठी आता जाणार नाही, कारण तिथे जास्त गर्दी असणार आहे. गर्दी कमी असेल तेव्हा मी नक्की जाणार आहे," असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. "देशातील भाविक रामासाठी एकत्र आला आहे. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोक आप आपल्या कामाला लागतील. याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे," असंही जयंत पाटील म्हणाले. 

दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा रामनवमीला हवा होता, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्यानंतर याबाबत भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलRam Mandirराम मंदिरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा