शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 17:02 IST

गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत.

इस्लामपूर : यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याचवेळी त्यांनी गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत, अशी मागणी केली.

येथील पत्रकार भवनात खा. शेट्टी यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी तुकडे पाडून दिली. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार एफआरपीमधील शिल्लक रकमेवर १५ टक्के व्याज देणे बंधनकारक आहे. तरीही साखर कारखानदारांनी व्याज सोडाच एफआरपीची मूळ रक्कमसुद्धा दिलेली नाही.

शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने साखरेचा भाव ३१०० रुपये इतका निश्चित केला आहे. तरीसुद्धा बाजारात साखरेला ३२०० ते ३३०० रुपये मिळत आहेत. कच्ची साखर निर्यातीलाही चांगला भाव मिळाला. केंद्राने इथेनॉल खरेदीचे भाव बांधून दिले. बी ग्रेड आणि हेवी मोलॅसिससाठी कारखान्यांनी जादा साखरेचे प्रमाण वापरले. त्यातून त्यांना ७५० रुपये प्रतिटन जादा मिळाले. साखरेचा रस वापरून इथेनॉलनिर्मितीतून ९०० रुपये प्रतिटन जादा मिळाले. या सर्व बाबी लक्षात घेता एफआरपीशिवाय आणखी २०० रुपये शेतकऱ्यांना देणे शक्य आहे.

ते म्हणाले, सगळेच कारखाने काटामारी करतात. राज्याचा विचार करता १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. १० टक्के काटामारी गृहीत धरल्यास एक कोटी ३२ लाख टन उसाची काटामारी झाली. त्यातून चार हजार ५०० कोटी रुपयांची साखर तयार झाली. त्यावर ५ टक्के जीएसटी धरल्यास कारखानदारांनी २२५ कोटी रुपयांचा कर बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यासाठीच आम्ही साखरेच्या गुदामावर छापे टाका, अशी मागणी केली होती.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने