शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 17:02 IST

गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत.

इस्लामपूर : यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याचवेळी त्यांनी गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत, अशी मागणी केली.

येथील पत्रकार भवनात खा. शेट्टी यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी तुकडे पाडून दिली. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार एफआरपीमधील शिल्लक रकमेवर १५ टक्के व्याज देणे बंधनकारक आहे. तरीही साखर कारखानदारांनी व्याज सोडाच एफआरपीची मूळ रक्कमसुद्धा दिलेली नाही.

शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने साखरेचा भाव ३१०० रुपये इतका निश्चित केला आहे. तरीसुद्धा बाजारात साखरेला ३२०० ते ३३०० रुपये मिळत आहेत. कच्ची साखर निर्यातीलाही चांगला भाव मिळाला. केंद्राने इथेनॉल खरेदीचे भाव बांधून दिले. बी ग्रेड आणि हेवी मोलॅसिससाठी कारखान्यांनी जादा साखरेचे प्रमाण वापरले. त्यातून त्यांना ७५० रुपये प्रतिटन जादा मिळाले. साखरेचा रस वापरून इथेनॉलनिर्मितीतून ९०० रुपये प्रतिटन जादा मिळाले. या सर्व बाबी लक्षात घेता एफआरपीशिवाय आणखी २०० रुपये शेतकऱ्यांना देणे शक्य आहे.

ते म्हणाले, सगळेच कारखाने काटामारी करतात. राज्याचा विचार करता १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. १० टक्के काटामारी गृहीत धरल्यास एक कोटी ३२ लाख टन उसाची काटामारी झाली. त्यातून चार हजार ५०० कोटी रुपयांची साखर तयार झाली. त्यावर ५ टक्के जीएसटी धरल्यास कारखानदारांनी २२५ कोटी रुपयांचा कर बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यासाठीच आम्ही साखरेच्या गुदामावर छापे टाका, अशी मागणी केली होती.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने