शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 17:02 IST

गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत.

इस्लामपूर : यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याचवेळी त्यांनी गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत, अशी मागणी केली.

येथील पत्रकार भवनात खा. शेट्टी यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी तुकडे पाडून दिली. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार एफआरपीमधील शिल्लक रकमेवर १५ टक्के व्याज देणे बंधनकारक आहे. तरीही साखर कारखानदारांनी व्याज सोडाच एफआरपीची मूळ रक्कमसुद्धा दिलेली नाही.

शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने साखरेचा भाव ३१०० रुपये इतका निश्चित केला आहे. तरीसुद्धा बाजारात साखरेला ३२०० ते ३३०० रुपये मिळत आहेत. कच्ची साखर निर्यातीलाही चांगला भाव मिळाला. केंद्राने इथेनॉल खरेदीचे भाव बांधून दिले. बी ग्रेड आणि हेवी मोलॅसिससाठी कारखान्यांनी जादा साखरेचे प्रमाण वापरले. त्यातून त्यांना ७५० रुपये प्रतिटन जादा मिळाले. साखरेचा रस वापरून इथेनॉलनिर्मितीतून ९०० रुपये प्रतिटन जादा मिळाले. या सर्व बाबी लक्षात घेता एफआरपीशिवाय आणखी २०० रुपये शेतकऱ्यांना देणे शक्य आहे.

ते म्हणाले, सगळेच कारखाने काटामारी करतात. राज्याचा विचार करता १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. १० टक्के काटामारी गृहीत धरल्यास एक कोटी ३२ लाख टन उसाची काटामारी झाली. त्यातून चार हजार ५०० कोटी रुपयांची साखर तयार झाली. त्यावर ५ टक्के जीएसटी धरल्यास कारखानदारांनी २२५ कोटी रुपयांचा कर बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यासाठीच आम्ही साखरेच्या गुदामावर छापे टाका, अशी मागणी केली होती.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने